Jalna News : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने तूर उत्पादन घेण्याऐवजी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने सामूहिकपणे बीजोत्पादन कार्यक्रम राबवावे त्यातून २० ते २५ टक्के अधिक आर्थिक लाभ होईल, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी व्यक्त केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कचरेवाडी, ता. जालना येथे बुधवारी (ता. २७) आयोजित तूर शेती दिन व पीकपाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कचरेवाडी गावाचे सरपंच प्रवीण ससाणे,
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पी. एल. सोनटक्के आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्रीकृष्ण सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे, धानुकाचे जिल्हा व्यवस्थापक दीपक नरवाडकर यांची उपस्थिती होती.
जगदीश जाधव यांचे शेतावर आयोजित या कार्यक्रमात श्री कापसे म्हणाले, की शेतकऱ्यांनी तुरीकडे नगदी पीक म्हणून बघावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राद्वारे ६० शेतकऱ्यांच्या शेतावर तुरीच्या बीडीएन-७११ आणि बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) या तुरीच्या सुधारित जातीची प्रात्यक्षिके देण्यात आली आहेत.
या प्रसंगी शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले. तर आभार डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.