Hybrid Cow  Agrowon
ॲग्रो विशेष

Hybrid Cow : जास्त तापमान संकरित गाईसाठी त्रासदायक

Team Agrowon

Animal Care : वातावरणातील तापमान वाढल्याने संकरित गाई त्यांच्या शरीराचे तापमान वाढू नये आणि ते सर्वसाधारण राहावे यासाठी प्रयत्न करते. पहिल्यांदा शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीराबाहेर ढकलणे आणि दुसरे म्हणजे शरीरात कमीत कमी ऊर्जा तयार होण्यासाठी दैनिक व्यवस्थापनात बदल करते.

सर्वसाधारणपणे  संकरित गाईसाठी ३३ अंश सेल्सिअस तापमान भारतीय गोवंश आणि म्हशीसाठी ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान योग्य समजले जाते. तापमान ज्या वेळेस जास्त होते, त्या वेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान घर्मग्रंथी किंवा धापण्याच्या प्राक्रियेमार्फत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.

ज्या वेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो. अशा वाढत्या तापमानाचा संकरित जनावराच्या शरिरावर नेमका काय परिणाम होतो याविषयीची माहिती पाहुया.

१) शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकण कठीण होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो.

२) संकरित जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे दूध उत्पादन,आरोग्य, आहार आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो.

३) शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रणासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. आहार कमी होऊन तहान, भूक मंद होते. जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरवात करते. यामध्ये श्‍वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्‍वासोच्छ्वास करते. श्‍वासोच्छ्वास उथळ, जास्त वेगाने होतो. नाडीचा वेग वाढतो.

४) जनावर स्वत: तपमान नियंत्रण करण्यापलीकडे जाते. शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरानहाइट वाढून कातडी कोरडी पडते. डोळे लालसर होतात, डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. लघवीचे प्रमाण कमी होते. जनावरे बसतात. गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.

५) ज्या वेळेस तापमान ३५ अंश सेल्सअसपेक्षा जास्त होते, त्यावेळेस दूध उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आणि जेव्हा हेच तपमान ४० अंश सेल्सअसपेक्षा जास्त जाते त्या वेळेस दूध उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते.

६) उष्णतेच्या परिणाम वासरे, कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो. दुधातील स्निग्धांश व प्रथिनाचे प्रमाण कमी होते. आहार कमी होतो.

७) प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. उष्णतेचा ताण असणारी गाय माजावर येत नाही. गाभण राहण्यास अडचणीचे ठरते. गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. खुरांचे आजार तसेच लंगडेपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त तापमानात संकरित गायींची अधिक काळजी घ्यावी लागते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT