Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : मध्य, उत्तरभारतात उष्णतेची लाट

Team Agrowon

सकाळ न्यूज नेटवर्क
Weather News : नवी दिल्ली ः हवामान खात्याने देशातील सात राज्यांसाठी पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून राजस्थानमध्ये रात्रीचे तापमान३० अंशांपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले. मध्य अन् उत्तर भारत अक्षरशः होरपळून निघत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची लाट असून राजस्थानमधील बारमेरमध्ये ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस ही लाट कायम राहणार आहे. यामुळे लोकांनी उन्हात अधिक काळ राहू नये असा इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

दिल्लीसह मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना आणि उत्तरप्रदेश या भागांत उष्णतेची लाट आली आहे. या राज्यांत विविध ठिकाणांवरचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांतही उष्णतेची लाट आहे. दिल्ली व हरियाना राज्यांमध्ये उद्या (ता.२५) मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी सुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील आजचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. परंतु काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

येथेही उष्णता
उष्णतेची लाट हरियानातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे तर राजस्थानमधील पाली, जैसलमेर, जोधपूर, बारमेर या भागासह मध्यप्रदेशातील सिहोर, शिवपुरी, ग्वाल्हेर, मुरैना, उत्तरप्रदेशातील आग्रा, झाशी या भागातही चांगलेच चटके जाणवू लागले आहेत. या लाटेमुळे केंद्रीय आरोग्य विभागाने जनतेसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. या लाटेची तीव्रता आणखी काहीकाळ राहू शकते असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT