Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : रत्नागिरीत शेवटच्या टप्प्यातील हापूसला पावसाची भीती

Mango Update : आंबा पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे. यामध्ये आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात तयार होत असलेला हापूस आंबा मे अखेरीस हाती येणार आहे. याच कालावधीत अवकाळी पावसाचे आगमन होते. त्यामुळे तयार होणारा आंबा पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे. यामध्ये आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

चिपळूण तालुक्यात यावर्षी हापूस आंब्याचे पीक समाधानकारक आहे. मात्र अनेक झाडांना उशिरा फळधारणा झाली आहे. तयार झालेला आंबा सध्या बाजारात विक्रीसाठी आला आहे. परंतु झाडावर असलेल्या आंब्याचे प्रमाण जास्त आहे. तो मे मध्ये तयार होणार आहे.

मे मध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारात येतो त्यामुळे दर घसरतात. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर आंब्याचे नुकसान होते. त्यामुळे विक्रेते आणि बागायतदार मिळेल त्या किमतीत आंबा विकतात परिणामी बागायतदार आणि विक्रेते दोघांचेही नुकसान होते. यावर्षी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

बाजारात सध्या हापूस आंब्याला चांगले दिवस आहेत. शेकडा चार हजार रुपये दराने हापूस आंब्याची विक्री सुरू आहे. काही विक्रेत्यांनी झाडावर लागलेला आंबा घाऊकमध्ये विकत घेतला आहे, तर काही बागायतदार नगावर आंबा विकत घेत आहेत. बागायतदार मोठा आंबा ३ हजार २०० रुपये आणि लहान आंबा तीन हजार रुपये दराने विकत आहेत.

जे बागायतदार थेट अंबा विक्री करतात त्यांना ८०० ते हजार रुपये जादा मिळत आहेत. अवकाळी पाऊस झाल्यानंतर आंबा खराब होतो. आंब्यावर बाहेरून काळे डाग पडतात. हे ग्राहकांना माहीत असल्यामुळे आंब्यावर पाऊस पडल्यानंतर ग्राहक आंबा जास्त किमतीत विकत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होते.

यावर्षी बहुतांश आंबा अजूनही झाडावर असून तो अद्याप तयार झालेल्या नाही मे च्या दुसऱ्या आठवड्यात तो तयार होण्याची शक्यता आहे. काही बागायतदार नैसर्गिकरीत्या आंबा पिकण्याची वाट न बघता कच्चा आंबा काढून तो कृत्रिमरीत्या पिकवून विकत आहेत. हापूस आंब्याला मागणी चांगली आहे, मात्र आंबा पुरेसा उपलब्ध होत नसल्यामुळे काही विक्रेत्यांनी थेट रत्नागिरीतून हापूस आंबा आणण्यास सुरुवात केली आहे.

गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याचे दर आवाक्यात येतात. या कालावधीत आंबा बऱ्यापैकी बाजारात येतो. या वेळी ५० टक्क्यांहून अधिक आंबा झाडावर आहे. तो मे मध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगला दर मिळणे कठीण आहे. त्याशिवाय अवकाळी पावसाचा हापूस आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा मुबलक आंबा येऊनही बागायतरांना नुकसान सोसावे लागणार आहे.
संदीप चव्हाण, बागायतदार, मार्गताम्हाणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT