Godavari Canals
Godavari Canals Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain News: गोदामाईला महापूर अन् गोदावरी कालवे मात्र कोरडेच

ॲग्रोवन वृत्तसेवा

शिर्डीः सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या तीन-चार दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर ही दोन्ही धरणे भरली. गोदावरी (Godavari River) दुथडी भरून वाहू लागली. मात्र गोदावरी कालव्यांना (Godavari canals) अद्यापही ओव्हर फ्लोच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पाणी वाटपासाठीचे निकष ठरविणाऱ्या मेंढेगिरी समितीच्या पहिल्या निकषानुसार जायकवाडीत ३७ टक्के पाणी असेल, तर या कालव्यातून खरिपासाठी पाणी सोडता येते. मात्र अद्याप तरी कालव्यांचे दरवाजे बंद आहेत.

नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील पर्जन्यछायेच्या प्रदेशासाठी ब्रिटिशांनी गोदावरी कालवे (Godavari canals) खोदले. यंदा सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असला तरी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तुलनेत कमी पाऊस आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विहिरी अद्याप कोरड्या आहेत. उजव्या कालव्यांच्या उत्तरेकडे दुष्काळी भाग आहे. तेथील परिस्थिती त्याहून कठीण आहे.

सध्या गोदावरी नदीतून तब्बल साठ हजार क्यूसेस पाणी जायकवाडी धरणाकडे (Jaykwadi Dam) निघाले आणि अवघ्या एक हजार क्यूसेस वहनक्षमतेच्या गोदावरी कालव्यांच्या दरवाजांना मात्र कुलूप आहे. या धरणाचा साठा पुढील दोन दिवसांत चाळीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे मेंढेगिरी समितीच्या निकषांच्या आधारे गोदावरी कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडणे सहज शक्य आहे.

कालव्यांच्या लाभक्षेत्रात सर्वदूर पेरण्या झाल्या आहेत. रिमझिम पाऊस पडत असल्याने खरिपाची पिकेदेखील जोमाने वाढत आहेत. मात्र भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल असा पाऊस अद्याप झालेला नाही. गोदावरी कालव्यातून पावसाळ्यात वाहणारे पाणी ओढे नाल्यात सोडले आणि बंधाऱ्यात साठविले तरच पाण्याची पातळी वाढते.

किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आजवरच्या एकूण पावसाची तफावत लक्षात घेता भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी गोदावरी कालव्यातून (Godavari canals) तातडीने पाणी सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी पुढाकार घ्यायला हवा.

यंदा विक्रमी पावसाची नोंद झाल्याने अवघ्या चार दिवसांत गंगापूर व दारणा ही दोन्ही प्रमुख धरणे भरली. मुकणे धरणातदेखील चार टीएमसी पाणीसाठा तयार झाला. जायकवाडी धरणात ३७ टक्के पाणीसाठा तयार झाला की खरिपासाठी गोदावरी कालव्यांतून पाणी सोडता येते. मेंढेगिरी समितीचा पहिला निकष हेच सांगतो. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी याआधारे पाणी सोडणे गरजेचे आहे.
उत्तमराव निर्मळ, निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT