Grape Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season Maharashtra : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे

Maharashtra Grape Prices : सद्यःस्थितीला २० टक्के क्षेत्रावरील हंगाम बाकी आहे. यंदाचा द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून दर टिकून होते. हंगामाच्या मध्यावर द्राक्षाच्या दरात वाढ झाली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. त्यातच देशभरातील बाजारपेठेत इतर फळांची आवक झाल्याने द्राक्षाचा उठाव कमी झाल्याने द्राक्षाच्या दरात प्रति किलोला पंधरा रुपयांनी घट झाली आहे. सद्यःस्थितीला २० टक्के क्षेत्रावरील हंगाम बाकी आहे.

यंदाचा द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून दर टिकून होते. हंगामाच्या मध्यावर द्राक्षाच्या दरात वाढ झाली. बाजारपेठेत द्राक्षाची आवक कमी असल्याने द्राक्षाचा उठावही चांगला झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्राक्षाच्या वाणानुसार पांढरी ५० रुपयांपासून ते ६० रुपये ते १२५ रुपये असा दर होता. त्यानंतरही दर टिकून होते. या दरम्यान ६० टक्के हंगाम आटोपला होता. मार्च महिन्याच्या मध्यापासून द्राक्ष विक्री गती आली.

गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष पट्ट्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसाचा फारसा फटका पिकाला बसला नसल्याचे द्राक्ष बागायतदार संघाने सांगितले. मात्र देशभरातील बाजारपेठेत इतर फळांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. परिणामी द्राक्षाची मागणी कमी झाल्याने उठाव कमी झाला आहे. यामुळे द्राक्षाच्या दर कमी झाले असल्याचे संघाने सांगितले.

सध्या द्राक्षाला प्रति किलोस ४० ते ५० रुपये असा दर मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून द्राक्षाचे दर टिकून आहेत. मात्र असेच वातावरण राहिल्यास द्राक्ष दर कमी होण्याची भीती द्राक्ष उत्पादकांना झाली आहे.

खरड छाटणीला गती

पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते. राज्यातील द्राक्ष विभागात खरड छाटणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आजअखेर ३० टक्के खरड छाटणी उरकली आहे. तर इतर भागात खरड छाटणीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.

विभागनिहाय शिल्लक द्राक्ष हंगाम

विभाग... टक्केवारी

सांगली...१०

पुणे...०५

सोलापूर...४०

नाशिक...१०

यंदाचा हंगामात दर चांगले मिळाले. मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर कमी झाले असून दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. खरड छाटणीस गती आहे.
- कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT