Sindhudurg News : जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवड आणि फळबागा मशागतीच्या तोंडावर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आणि मिश्रखत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर भातपीक लागवड होत असल्याने मोठ्या प्रमाणात खतांची गरज भासते.
या वर्षी ५५ हजार हेक्टरवर भातपीक लागवड, तर ३ हजार क्षेत्रांवर नागली पिकांची लागवडीचे उद्दिष्ट गृहीत धरून कृषी विभागाने जिल्ह्याकरिता १९ हजार ५५७ टन खतांची मागणी केली होती. परंतु १८ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २५८.८२ टन खत उपलब्ध झाले आहे.
यामध्ये १ हजार २५४.५३ टन युरियाचा समावेश आहे. जिल्ह्यात भातरोप वाढीकरिता युरियाचा वापर अधिकतर शेतकरी करतात. याशिवाय लागवड करताना मिश्रखतांचा वापर केला जातो.
जिल्ह्यातील अधिकतर शेतकऱ्यांना सहकारी सेवा सोसायट्यांमार्फत खत पुरवठा केला जातो. यंदा कमी प्रमाणात खत पुरवठा झाल्यामुळे खत पुरवठा करताना सोसायट्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मागणीच्या ६० टक्के खत पुरवठा झाला. हे खत सोसायट्यांना पुरविण्यात आले. परंतु मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना खत पुरविताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीच्या काळात युरियाचा वापर शेतकरी करीत असल्याने युरियाची कमतरता भासत आहे.- सिद्धेश रावराणे, व्यवस्थापक, तालुका खरेदी-विक्री संघ, वैभववाडी
हंगामात युरिया, डीएपी आणि इतर खतांचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत. दोडामार्ग तालुक्यातील काही शेतकरी गोव्यातून, तर काही शेतकऱ्यांनी कोल्हापुरातून खत खरेदी केले. आंबा, काजूला खते घालण्याच्या वेळी खत उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.- संजय देसाई, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, दोडामार्ग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.