Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : खानदेशात फळपीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात २०२३-२४ च्या हंगामासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत केळी पिकासंबंधी विमा संरक्षणाचे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत.

परंतु दुष्काळी स्थिती, अधिकचा विमा हप्ता व मागील परतावे किंवा नुकसान भरपाई न मिळाल्याने योजनेला अत्यल्प प्रतिसाद केळी उत्पादकांकडून जिल्ह्यात मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत योजनेतील सहभाग ७० टक्के घटला आहे.

फळ पीकविमा योजनेत मागील हंगामात (२०२२-२३) सहभागी झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार ५०० पेक्षा अधिक होती. एकूण ८१ हजार ८१० हेक्टर एवढ्या केळीसंबंधीच्या क्षेत्रास विमा संरक्षण मागील हंगामात शेतकऱ्यांनी घेतले होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील हंगामात २३ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी या योजनेतून विमा संरक्षण घेतले होते. परंतु यंदा सोमवारपर्यंत (ता. २३) या योजनेतून फक्त आठ हजार ८४२ शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.

ज्यांनी केळीची लागवड केली आहे, पीक वाढीस लागले, असेच शेतकरी योजनेत सध्या सहभागी होऊ शकतात. पुढील काळात केळी लागवड करणारे शेतकरी योजनेत सध्या सहभागी होऊ शकत नाहीत.

कारण योजनेत सहभाग घेतल्यानंतर लागलीच विमा कंपनी संबंधित विमाधारक शेतकऱ्याकडे केळी लागवड केली आहे की नाही, किती लागवड केली आहे, किती क्षेत्रासाठी विमा संरक्षण आहे,

याची प्रत्यक्ष पाहणी करून (जिओ टॅगिंग) पडताळणी, चौकशी करीत आहे. शेतात केळी नाही व विमा योजनेत सहभाग घेतलेला असल्यास संबंधित विमाधारकाचा विमा हप्ता जप्त करून विमा पॉलिसी रद्द केली जात आहे.

यामुळे पुढे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत केळी लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेपासून दूर राहणे पसंत केले आहे. परिणामी, योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

योजनेला अल्प प्रतिसादाची कारणे...

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेस यंदा किंवा २०२३-२४ या वर्षासाठी कमी प्रतिसादाबाबत विविध कारणे शेतकरी सांगत असून, त्यात दुष्काळ आणि विमा योजनेचा हेक्टरी १० हजार ५०० रुपये हा अधिकचा किंवा न परवडणारा विमा हप्ता ही मुख्य कारणे आहेत.

तसेच मागील हंगामात सहभागी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना केळी पिकाचे परतावे किंवा नुकसान भरपाई या योजनेतून मिळालेले नाहीत. परतावे कुणाला व केव्हा मिळतील, या बाबत कृषी विभाग, विमा कंपनीकडून सहकार्य, योग्य माहिती दिली जात नाही.

योजनेत अनेक त्रुटी

इतर फळ पिकांसाठी मृग व आंबिया अशा दोन बहरात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून विमा संरक्षण घेणे शक्य आहे. परंतु केळी पिकासाठी वर्षातून फक्त एकदाच म्हणजे रब्बी हंगामअंतर्गत आंबिया बहरात ऑक्टोबर महिन्यात विमा संरक्षण घेणे शक्य आहे. केळीची बारमाही लागवड केली जाते. यामुळे केळी पिकासाठी वर्षातून दोन वेळेस योजनेतून विमा संरक्षणाचे प्रस्ताव स्वीकारले जावेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तसेच या योजनेत कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही), करपा (येलो सिगाटोका) या रोगराईसंबंधी विमा संरक्षण मिळत नाही. फक्त १ नोव्हेंबर ते ३१ जुलै, अशा नऊ महिन्यांसाठीच केळीला विमा संरक्षण दिले जाते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये वादळ, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटे आल्यास केळीला या योजनेतून विमा संरक्षण मिळत नाही.

केळी पिकाला फक्त एकदाच रब्बी हंगाम अंतर्गत आंबिया बहरात विमा योजनेतून विमा संरक्षण मिळते. इतर फळ पिकांना मृग बहरातही विमा संरक्षण मिळते. यामुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत. तसेच इतर अनेक त्रुटी योजनेत आहेत.
एस. बी. पाटील, शेतकरी कृती समिती, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT