Carbon Credit Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Carbon Credit Scheme : शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिट योजनेचा लाभ घ्यावाः अथांग जैन

Environment Balance : शेतीमुळे कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात यश येते. परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही मिळवता येऊ शकतो.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : ‘‘शेतीमुळे कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात यश येते. परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही मिळवता येऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन जैन फार्म फ्रेश फुड्चे संचालक अथांग जैन यांनी केले.

जैन इरिगेशनच्या हवामान स्मार्ट शेती आधारित हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि मातीत सेंद्रिय कार्बन सुधारणेसाठी प्रकल्पासाठी भागधारक परामर्श बैठकीत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

या वेळी सुरत येथील श्री सायन शुगर फॅक्टरी सायन अध्यक्ष राकेश पटेल, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. व्ही. दहात, स्मार्ट प्रोजेक्ट आत्मा संस्थेचे श्री जाधवर, श्रीकांत झांबरे, कापूस संशोधन केंद्राचे गिरीश चौधरी, तज्ज्ञ आशिष सोनी, धर्मेश पटेल, ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, यशदाच्या कल्पना पाटील, शुभांगी भोळे (नाशिक) प्रमुख अतिथी होते. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जगभरातील विविध भागातील तज्ज्ञ, अभ्यासक, शेतकरीदेखील सहभागी झाले.

जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करीत आहे, यासंबधी हा कार्यक्रम झाला. पहिल्या सत्राच्या यशस्वितेसाठी डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. निर्मला झाला, डॉ. अनिल ढाके, डॉ. जयश्री राणे व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. कार्बन क्रेडिट या विषयाच्या संदर्भात जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केळी पिकामुळे कार्बन उत्सर्जन कसे कमी करते याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, जैन टिश्युकल्चर तंत्रज्ञानाने गत ३० वर्षात साध्य केले आहे.

पूर्वी २० ते २२ महिने केळीच्या पिकाला लागत होते त्यातून २५ टन प्रतिहेक्टर केळीचे उत्पादन होत होते. आज २० महिन्यात जैन टिश्युकल्चर केळीचे दोन पीक शेतकरी घेत आहेत त्यामुळे २० महिन्यात एका झाडापासून ५० किलो उत्पादन मिळत आहे. यासोबतच एका पिकातून एकरी १५० टन बायोमास म्हणजे दोन पिकातून ३०० टन बायोमास जमिनीत गाडला जातो त्यामुळे जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन वाढतो.

ठिबक वापरातून पाणी बचत ः डॉ. जडे

जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे म्हणाले, की ठिबक सिंचन हे पिकांना पाणी देण्याचे अथवा सिंचनाचे साधन नसून पाणी वापरात बचत बरोबरच पिकांचे उत्पादन वाढीकरिता तसेच या तंत्रज्ञानामुळे विजेची ३३ टक्के बचत होते.

तसेच रासायनिक खताच्या वापरामध्ये ही ३० टक्के बचत होते. जैन इरिगेशनच्या पुढाकारामुळे ऊस, कापूस या पिकांमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सर्व पिकांमध्ये राज्यात कापूस पिकाकरिता ठिबक सिंचनाचा सर्वात अधिक वापर होत आहे. ऊस पिकाकरिता खूप पाणी लागते हा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT