Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Payout: पीकविम्याचे २१६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; राज्य सरकार २ दिवसांत देणार हप्ता

Maharashtra Farmers Insurance: राज्यातील २२ जिल्ह्यांतील ५४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीकविमा योजनेअंतर्गत २१६० कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली असून, राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना ७०० कोटींचा पहिला हप्ता देणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: शेतकरी खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने २२ जिल्ह्यांमधील जवळपास २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला ७०० कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्या सुरुवात होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

खरिप २०२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले आहे. राज्यातील ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची, याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे.

पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. राज्याला जवळपास ७०० कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले. तसेच काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदूरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागूपर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. 

या २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून १४५५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ९६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ७०५ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली. 

सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधूनच भरपाई मिळणार आहे. काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT