Soybean Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Subsidy : कंधार, लोह्यातील शेतकरी मदतीपासून पुन्हा वंचित

Rain Crop Compensation : मदत व पुनर्वसन विभागाने मात्र याबाबत माहिती मागविली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अतिवृष्टीच्या अनूदानापासून वंचित असलेल्या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा उघड्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पक्वतेपुर्वीच वाळून गेल्यामुळे कंधार, लोहा तालुक्यासह इतर तीन तालुक्यातील ९३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाने ८० कोटींच्या मदतीची मागणीही कृषी आयुक्तालयाकडे केली.

परंतु मदत व पुनर्वसन विभागाने मात्र याबाबत माहिती मागविली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अतिवृष्टीच्या अनूदानापासून वंचित असलेल्या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा उघड्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

नांदेड जिल्ह्यात सोयाबीनवर यलो मोझॅक हा विषाणुजन्य रोग आणि खोडकुज व मुळकुज या बुरशीजन्य रोगामुळे पिकाला बाधा झाली होती. याबाबत राज्य शासनाने पंचनामे करुन नुकसानीचे क्षेत्र करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील ४७८ गावातील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाली.

यात नांदेडमधील कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यातील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोचल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाला पाठविला. परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून अद्याप कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही.

यामुळे कंधार, लोहा, मदखेड, नायगाव व नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. दरम्यान जून-जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकरी वगळून सहा लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ४२० कोटी ४६ लाख मंजूर झाले आहेत. ही भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

तर दुसरीकडे मात्र इतर १४ तालुक्यातील शेतकऱ्याप्रमाणेच नुकसान होवूनही प्रशासकीय दूरदृष्टीमुळे कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे, लागले होते. यानंतर बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीत कंधार व लोहा तालुक्याचे क्षेत्र शासनाला कळविण्यात आले, परंतु भरपाई देण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने सोयाबीन नुकसानग्रस्त पुन्हा एकदा उघड्यावर पडले आहेत.

यामुळे झाले सोयाबीनचे नुकसान

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यांत दिसून आल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडून वाळले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे अतिवृष्टी अनूदानापासून वंचित असलेल्या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन नुकसानीबाबत भरपाईची मागणी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT