Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Crop Insurance: खानदेशात शेतकऱ्यांना आणखी ४७ कोटी विमा भरपाई मिळणार

Farmer Compensation Payout: शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत १५४ कोटी रुपये भरपाई वाटण्याचे निश्चित झाले. त्यापैकी १०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.

Anil Jadhao 

Pune News: नाशिक आणि खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील भरपाई निश्चित करण्याचे आणि खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत १५४ कोटी रुपये भरपाई वाटण्याचे निश्चित झाले. त्यापैकी १०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर ४७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार तसेच नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई निश्चित झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली नाही. या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत १५४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १०७ कोटी रुपये जमा झाले. तर ४७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. लकवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले.

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. शेतकऱ्यांना ५८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २४ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३४ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

धुळे

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत २९ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास २३ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

नंदूरबार

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधूनच भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना ५ कोटी रुपये मिळाले. तर ११ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधूनच भरपाई मंजूर झाली. शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ५१ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे ठरले होते. त्यापैकी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT