Sugarcane Issue Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Issue Kolhapur : ऊस तोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट, साखर कारखानदारांकडूनही बेदखल

Sugarcane Workers : ५० टन उसाचे सरासरी ३ हजार रुपयांप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये होतात. यापैकी ५ हजार रुपये केवळ ऊसतोडणी करणाऱ्यांनाच द्यावे लागत आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Season Kolhapur : यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर मिळणार का? शेतकरी संघटनांचे आंदोलन यशस्वी ठरणार का यावर चर्चा सुरू आहे. मात्र, साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या मजुरांकडून प्रतिटन उसामागे १०० रुपये सक्तीने घेतले जात आहेत. ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची २० गुंठे ते ५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. एकरी ५ हजारांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून ऊसतोड हंगामाला जोर आला आहे. अनेक कारखान्यांवर अपेक्षित ऊसतोड कामगार नसल्याचे कारण सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून ऊसतोड करावी, असे साखर कारखान्यांकडून आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:हून ऊसतोड करण्याचे नियोजन होत नाही, त्या शेतकऱ्यांकडून कारखान्यांचे ऊसतोड मजूर प्रतिटनामागे १०० रुपये घेत आहेत. ज्यांची एक एकर शेती आहे त्यांना ३ ते ५ हजरा रुपयांना फटका बसत आहे.

५० टन उसाचे सरासरी ३ हजार रुपयांप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये होतात. यापैकी ५ हजार रुपये केवळ ऊसतोडणी करणाऱ्यांनाच द्यावे लागत आहेत, तर उर्वरित रकमेपैकी पीक कर्ज, मुलांच्या शाळांचा खर्च, सण-समारंभ याशिवाय घर खर्च चालवावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. यावर तक्रार कोणाकडे करायची हेच शेतकऱ्यांना समजत नसल्याचे चित्र आहे. कारखानदारांच्या चीट बॉय किंवा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास याची दखल घेतली जात नाही.

जिल्ह्यातील सुमारे सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची राजरोस लूट सुरू आहे. याबाबत साखर कारखान्यांकडे तक्रार केली, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. तुम्ही पैसे देणार नसाल, तर आम्ही तुमचा ऊस तोडणार नाही, म्हणून शेतकऱ्यांना धमकी दिली जात आहे. यातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांला विनाकारण त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे अतिवृष्टी, पुरातून वाचवलेला ऊस वेळेत तोडला जावा, यासाठी शेतकऱ्यांकडून विनंती केली जात असताना त्यांच्यावर आर्थिक लुटीचे दुसरे संकट उभे आहे.

शेतकरी हतबल

पैसे दिल्याशिवाय ऊस तोडणार नाही, अशी जाहीर भूमिका ऊसतोड मजुरांकडून घेतली जात आहे. एकीकडे उसाला मिळणारा दर हा उत्पादन खर्चानुसार मिळत नाही. यातही तेरा ते चौदा महिन्यांनंतर ऊस तोडला जात असताना ऊसतोड मजुरांकडून होत असलेल्या आर्थिक लुटीसमोर शेतकरी हतबल झाला असल्याचे प्रकाश खटकोळे या शेतकऱ्यांने सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT