Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाऊस नसल्याने टँकरला मुदतवाढ

Water Shortage : गेल्या महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र अनेक भागांत पाऊस झाला नसल्याने अनेक गावे व वाड्या- वस्त्यांवर पावसाची टंचाई आहे

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र अनेक भागांत पाऊस झाला नसल्याने अनेक गावे व वाड्या- वस्त्यांवर पावसाची टंचाई आहे. त्यामुळे सध्या पाणीपुरवठ्याची भिस्त टँकरवरच असल्याने ते जुलैमध्येही सुरू आहेत.

एकीकडे शासनाने ३० जूनपर्यंत टँकरची मुदत दिली होती. मात्र ती संपुष्टात आली. या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठ्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही मुदत ३१ जुलैपर्यंत राहणार आहे.

जिल्ह्यात येवला, मालेगाव, सिन्नर, चांदवड, नांदगाव देवळा, बागलाण तालुक्यात पाणीटंचाई आहे. शिवाय धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या पेठ तालुक्यातही अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने येथेही टँकर सुरू आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ९३५ गावे वाड्यांना २२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र काही ठिकाणी पाऊस झाल्याने महिनाभरात टँकरची संख्या १५० ने घटली आहे.

मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. मागील वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर आता पावसाळ्यातही सुरूच आहेत. टँकरची संख्या ४०० वर पोहोचली होती. ७ जूनला जिल्ह्यातील ३६२ गावे आणि ९४१ वाड्या, अशा १ हजार ३०३ ठिकाणी ३९८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

जिल्ह्यातील ७ लाख १६ हजार ५०१ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. साधारणः जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले, जूनअखेरपर्यंत टँकर बंद होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने टँकरची संख्या घटली आहे. मात्र जिल्हाभरात अजूनही काही ठिकाणी पावसाने समाधानकारक व पाण्याची टंचाई दूर होईल, अशी हजेरी लावलेली नाही.

धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात २२८ टँकरद्वारे २२६ गावे आणि ७०९ वाड्या,अशा ९३५ ठिकाणी ४ लाख ५० हजार १८५ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला परवानगी दिली होती.

मात्र ग्रामीण भागात पुरेशा पाऊस न झाल्याने राज्य सरकारने टँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात येणार आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात १६३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.यात बागलाण (४५) व मालेगाव (४१) तालुक्यात सर्वाधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर

नांदगाव (३६), येवला (४५), मालेगाव (३३), सिन्नर (२६), बागलाण (४३), देवळा (२१), चांदवड (२३), पेठ (१) दिंडोरी, कळवण, निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT