Maharashtra Politics Update : सत्तासंघर्षाच्या निमित्ताने चाललेल्या निकाल वाचनात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार बचावले आहे. सर्वाच्च न्यायायलाने उद्धव ठाकरे यांना दणका दिला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थितीचा विचार करू शकलो असतो. सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल वाचताना निरीक्षण नोंदवलं आहे.
तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील, असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
१६ आमदारांच्या अपात्रेबाबत असणारा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर द्यावा, असा निर्णय आज (दि.११) रोजी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे.
तसंच आमदारांच्या अपात्रेबाबत फक्त विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया मराठी वृत्तवाहिनी 'एबीपी माझा'ला राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर येणाऱ्या काळात कोणता निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सर्वाच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाची अंतिम निकालाचे वाचन केले. व्हिप न पाळणं म्हणजे पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे.
तसेच अध्यक्षाचे अधिकार आणि नमाब रेबिया प्रकरण सात न्यायामुर्तीच्या बेंचकडे वर्ग करण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती. असं निरीक्षण या निकाल पत्रात नोंदवण्यात आले.
या निकालाचे वाचनाला दुपारी १२ वाजता सुरू झालं. सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचन केलं.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.