Wheat Management Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Irrigation Management : भरघोस गहू उत्पादनासाठी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन

Wheat Irrigation : गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन कराव लागतं. गव्हाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतात.

Team Agrowon

Wheat Crop Management : गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन कराव लागतं.  गव्हाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतात.

तुम्ही जर गव्हाची लागवड भारी जमिनीत केली असेल तर १८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या ६ पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीतील गव्हाला १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात तर गव्हाची लागवड जर हलक्या जमिनीत केली असेल तर  १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. पाणी देत असताना गव्हाच्या महत्वाच्या अवस्था लक्षात घ्याव्यात.

या काळातच गव्हाला पाणी द्यावं. गव्हाच्या महत्वाच्या अवस्थांपैकी मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यास मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येऊन उत्पादनात घट येते.

फुटवे फुटण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी ओंब्या कमी बाहेर पडतात. या काळात जर गव्हाला पाणी मिळाले नाही तर बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते.

पीक फुलोऱ्यात आल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी पाणी कमी पडले तर परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.

दाण्यात चिक भरण्याच्या वेळी पेरणीनंतर ९० ते १०० दिवसांनी या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. पण या काळात जमिनीत ओलावा कमी असेल तर दाण्याचा आकार लहान होतो आणि दाण्याचं वजनही कमी होत.

गव्हाच्या दाणे टणक होण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर ११० दिवसांनी जमिनीत ओलावा कमी असेल तर दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून गव्हाची प्रत खालावते. त्यामुळेही उत्पादनात घट येते.

उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन कसं करायचं 

गव्हाला जर एकच पाणी देणं शक्य असेल, तर ते पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी द्यावं. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी आणि दुसरं पाणी ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. तीन पाणी देणं शक्य असेल तर, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, आणि दुसरं पाणी ५५ ते ६० दिवसांनी, तर तिसरे पाणी ७० ते ८० दिवसांनी द्यावं. चार पाणी देणं शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तिसरे ७० ते ८० दिवसांनी, तर चौथे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावं. तर पाच पाणी देणं शक्य असल्यास, पहिलं पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरं ४० ते ४५ दिवसांनी, तिसरं ५५ ते ६० दिवसांनं आणि चौथ पाणी ७०ते ८० दिवसांनी, तर पाचवं पाणी हे ९० ते १०० दिवसांनी द्यावं. अशा प्रकारे आहे त्या पाण्याच योग्य नियोजन केलं तर गहू उत्पादन वाढण्यास मदत होते. 

-----------

माहिती आणि संशोधन - डॉ. आदिनाथ ताकटे,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT