Team Agrowon
गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या ६ पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या, तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. त्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचन व्यवस्थापन करावे.
मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यास मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येऊन उत्पादनात घट येते.
एकच पाणी देणे शक्य असल्यास, ते पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तर तिसरे पाणी ७० ते ८० दिवसांनी द्यावे.
चार पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तिसरे ७० ते ८० दिवसांनी, तर चौथे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.
पाच पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४० ते ४५ दिवसांनी, तिसरे ५५ ते ६० दिवसांनी, चौथे पाणी ७०ते ८० दिवसांनी, तर पाचवे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.
Orgainc Farming : सेंद्रिय शेतीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.