Takari Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘कोयना’चे पाणी न सोडल्याने ‘ताकारी’ बंद करण्याची वेळ

Team Agrowon

Sangli News : कोयनेतून सुरुवातीला एक, त्यानंतर एक असे दोन टीएमसी पाणी सोडले. त्यानंतर ताकारी उपसा सिंचन योजनचे रब्बीचे आवर्तन सुरू झाले. परंतु कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

वास्तविक कोयना धरणातून पाणी सोडण्याची गरज असताना पुन्हा धरणातून पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ सुरू झाली असल्याने रब्बी हंगामासाठी सुरू असलेले ‘ताकारी’चे आवर्तन बंद करण्याची वेळ आली आहे. सांगलीचे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या एक दीड महिन्यापूर्वी कृष्णा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार पाणी सोडले.

ते केवळ एक टीएमसी. त्यानंतर गेल्या महिन्यात एक टीएमसी पाणी सोडले. परंतु हे दोन टीएमसी पाणी पुरेसे नव्हते. तरीही पाणीटंचाई लक्षात घेता ताकारी योजनेचे रब्बीसाठी आवर्तन सुरू केले. आणखी दोन टीएमसी पाण्याची तातडीने मागणी होती, मात्र त्याला मान्यता दिली नाही.

ताकारी योजनेचे आवर्तन ६ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. साधारण हे आवर्तन १६ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन होते. यंदा रब्बीच्या पहिल्या आवर्तनातील आणखी २५ दिवस शिल्लक असताना पाणी बंद झाल्याने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पाणी सांगलीचे, मालक साताऱ्याचे

कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे. त्यात प्राधान्याने टेंभू, ताकारी योजनांसह खासगी उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सांगलीला ३२ टीएमसी हक्काचे पाणी मिळणार आहे, मग ते कधी द्यायचे आणि कधी अडवायचे, याचा निर्णय साताऱ्याचे नेते शंभुराज देसाई का करत आहेत, असा आरोप सांगलीतील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

पालकमंत्री, खासदार, आमदार पुन्हा गप्प

पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, अनिल बाबर ही मंडळी या प्रश्‍नावर आधी आक्रमक होती. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी शंभुराज देसाई यांच्याबाबत योग्य ठिकाणी बोलू, असे सांगितले होते. त्याचे काय झाले? ते आताही गप्प आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT