Ujani Dam water storage agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे उजनी १०० टक्के भरले

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले आणि पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे उजनी धरण सोमवारी (ता.५) १०० टक्के भरले. त्यामुळे धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी ११ वाजता तब्बल १ लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. तर उजनी यंदा गेतवर्षीच्या तुलनेत ६६ दिवस आधीच भरले आहे.

तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरणारे उजनी धरण गेल्या तीन वर्षात यंदा १०० टक्के भरले. गेल्या वर्षी उजणी ६६ टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या वर्षी धरण क्षेत्रावर अवलंबून असणारा संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला होता. परंतु यंदा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्या पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. यामुळे तीन जिल्ह्यांतील सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

फक्त १० दिवासात उजनी १०० टक्के

उजनी यंदा २५ जुलैपर्यंत उणे पातळीत होते. त्यामुळे पुणे, नगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील ४२ पाणीपुरवठा योजनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेल्या १० दिवसापासून पुण्यात मुसळधार सुरू असणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के भरले आहे. सध्या उजनी धरणात दौंडवरून २ लाख क्युसेक पाणी येत आहे.

धरणाची पाण्याची क्षमता ११७.२८ टीएमसी असून यात ५३.५७ टीएमसी उपयुक्त, ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे. सध्या धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा झाला असून सध्या दोन लाख पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भीमा नदी पात्रात १ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान वीर धरणही भरल्याने भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

भीमा नदीवरील १०५ गावांना पूराचा धोका

सध्या उजनीतून भीमा नदीत १ लाख क्युसेक आणि वीर धरणातून ३० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पण पंढरपूर परिसरातील नदी पात्राची क्षमता ही १ लाख २० हजार क्युसेकपर्यंत आहे. यापेक्षा १० हजार क्युसेक पाणी अधिक नदी पात्रात येत असल्याने भीमा नदी पात्रावरील १०५ गावांना पूराच्या धोका उद्भवू शकतो. त्यामुळे भीमा नदी पात्रावरील गावांना ग्रामसुरक्षा समित्यांच्या माध्यमातून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच पूर येऊन जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी

दरम्यान प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन ग्रामसुरक्षा समित्यांसाठी १८००२७०३६०० असा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकाच्या मदतीने पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, तहसिलदार यांच्या थेट संपर्क साधता येणार आहे. तसेच पूरस्थिती उद्भवल्यास सातारा, कोल्हापूर आणि पुण्यावरून एनडीआरएफचे पथक देखील बोलवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT