Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळामुळे पुढचे भवितव्य चिंताजनक !

Central Inspection Team : खामखेड्यात शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, केंद्रीय पथकाची वेगवान पाहणी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे / ॲग्रोवन वृत्तसेवा
Sambhajinagar News : ‘‘उशिराने आलेला पाऊस, उशिरा झालेली पेरणी, त्यामुळे मका पिकात दाणेच भरले नाहीत. विहिरांनाही पाणी नाही. खिशातला पैसाही संपून गेला आहे. पुढचे भवितव्य चिंताजनक आहे,’’ अशी व्यथा केंद्रीय पथकापुढे मांडून सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक बुधवारी (ता.१३) मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत दाखल झाले. त्यावेळी कामखेडा येथील गणेश मुठे व इतर शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या वेगवान पाहणीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय पथकातील हरीश उंबरजे व ए. एल. वाघमारे यांच्या द्विसदस्यीय पथकाने बुधवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, दोनवाडा तसेच सोयगाव तालुक्यांतील जंगला तांडा, फर्दापूर, घनवट शिवार आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दुष्काळ पाहणी केली. दुष्काळामुळे झालेली पिकांची स्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई, टँकरने होणारा पाणीपुरवठा, जलसाठ्यांची स्थिती, शेततळ्यांची स्थिती आदींची माहिती घेतली.

तुळजापूर येथील परमेश्वर जगदाळे यांच्या कापूस पिकाची माहिती घेतली. त्यानंतर मोरहिरा येथील रमाकांत कुटे यांच्या कपाशीच्या पिकाची पाहणी करून गेल्या वर्षीच्या उत्पादकतेचा व आताच्या उत्पादनाचा आढावा घेतला. त्यानंतर हे पथक खामखेडा येथील शेतशिवारात दाखल झाले. येथील मका पिकाची पाहणी केल्यानंतर पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी गणेश मुठे आणि शेतकऱ्यांनी उशिराने आलेल्या पावसामुळे पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे मका पिकात दाणेच भरले गेले नाहीत. पाऊस कमी झाल्याने आता विहिरींनाही पाणी नाही. शेततळ्यातही पाणी नाही. पुढची चिंता सतावते आहे. अशा वेळी सरकारनेच आधार द्यायलाच हवा, अशी मागणी केली.

त्यानंतर पथक दोनवाडाकडे रवाना झाले. तेथे पंकज भागवत व दादाराव पवार यांच्या कपाशी पिकाची पाहणी केली. पुढे सोयगाव तालुक्यात पथक दाखल झाले. जंगला तांडा येथील जुगाराज राठोड, वासुदेव खेडकर, फरदापूर येथील विजय सोनवणे, घनवट शिवारातील मुरलीधर सोनवणे आदींच्या शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर पिकांच्या नुकसानीची व त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची माहिती केंद्रातल्या पथकाने जाणून घेतली. ही माहिती घेत असताना मागील वर्षीचे उत्पादन, यंदाचे सरासरी उत्पादनाची माहिती घेतली.

केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतल्यावर सरकारने २४ तासांच्या आत मदत द्यावी, अशी मागणी केली. घनवट शिवारातील शेतकऱ्यांनी केली. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातही पाहणी केली.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. झोड, शास्त्रज्ञ डॉ. पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आदींची या वेळी उपस्थिती होती.
पथकाच्या दुसऱ्या गटाने बुधवारी (ता.१५) धाराशीव व बीड जिल्ह्यांची पाहणी केली.

कोट..
दुष्काळामुळे पिकांची झालेली अवस्था, त्यानंतर निर्माण झालेली स्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई आदींची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट मुख्य पथकाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर तो शासनास सादर केला जाणार आहे.
- ए. एल वाघमारे,
केंद्रीय पथक सदस्य
Remarks :
छत्रपती संभाजी नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

NCCF Branch Manager Transfer: ‘एनसीसीएफ’च्या शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली

CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी

Maharashtra Rain: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Nashik Heavy Rain : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT