Maharashtra Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought : दोन दिवसांत दुष्काळ जाहीर होणार; ४२ ऐवजी ४० तालुक्यांचा समावेश

Drought Condition : राज्यात अवर्षणामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानंतर आता बुधवारी किंवा गुरुवारी दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Team Agrowon

Mumbai News : राज्यात अवर्षणामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानंतर आता बुधवारी किंवा गुरुवारी दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या १५ जिल्ह्यांतील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी निकषांच्या छाननीनंतर ४२ पैकी ४० जिल्ह्यांमध्येच दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मात्र, केंद्र सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर राज्यातील ४२ तालुके पात्र ठरले आहेत. तत्पूर्वी राज्यातील १९४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यानुसार या तालुक्यांमध्ये दुसऱ्या ट्रिगरनुसार माहिती भरण्यात आली. त्यानुसार केवळ ४२ तालुके पात्र ठरले आहेत. मात्र, या तालुक्यांची पुन्हा नव्याने छाननी करण्यात आली असून त्यातील दोन तालुके कमी होण्याची शक्यता असल्याचे, मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरमध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक, प्रभावदर्शक निर्देशांक, यामध्ये सामान्य फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय), सामान्य आर्द्रता निर्देशांक (एनडीडब्ल्यूआय) आणि वनस्पती स्थिती निर्देशांक तपासण्यात येतात.

तसेच वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक, पाणीविषयक निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक आदी निर्देशांक तपासले जातात. पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानातील तूट तपासल्यानंतर सरासरी पर्जन्य तपासून दुसरा ट्रिगर लागू होतो. सध्या दोन्ही ट्रिगर लागू झालेल्या तालुक्यांची छाननी सुरू आहे.

सध्या मोठा दबाव असल्याने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्याची धावपळ सुरू असून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची स्वाक्षरी झाल्यानंतर शासन आदेश काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया बुधवारी किंवा गुरुवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती

जमीन महसुलात सूट.

पीक कर्जाचे पुनर्गठन.

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती.

कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.

‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स.

शेती पंपांना अखंडित वीज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Administration Failure: गतिमान प्रशासन (!)

Mango Season: पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार

Banana Market: खानदेशात केळीची आवक कमी कमाल दर ७०० रुपये प्रति क्विंटल

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून पणनमंत्री रावल : आजपासून नोंदणी

Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू

SCROLL FOR NEXT