Maharashtra Drought agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Drought Crisis : मराठवाड्यामध्ये दुष्काळ अधोरेखित

Drought Condition : ८४९६ गावांतील पैसेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे केवळ ४६.९९ पैसेच आली आहे. ५० पैशांच्या आत आलेल्या या पैसेवारीने दुष्काळ अधोरेखित केला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात एकूण गावांची संख्या ८५०१ आहे. परंतु त्यापैकी बीड जिल्ह्यातील ५ गावे पूर्णतः धरणात बुडीत आहेत. त्यामुळे उरलेल्या सर्व ८४९६ गावांतील पैसेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे केवळ ४६.९९ पैसेच आली आहे. ५० पैशांच्या आत आलेल्या या पैसेवारीने दुष्काळ अधोरेखित केला आहे. ही बाब चिंता वाढविणारी असून, रब्बीवरीलही संकट पाहता आता सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

साधारणपणे ३० सप्टेंबरला हंगामी ३० ऑक्‍टोबरला सुधारित आणि १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्याचा प्रशासकीय प्रघात आहे. ३० सप्टेंबरला जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीत ८४९६ गावांपैकी ४५८५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत, तर ३९१२ गावांतील पैसेवारी ५० पैशांच्या पुढे आली होती. त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर झाली.

त्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आलेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १७ तालुक्‍यांतच प्रशासनाला गंभीर दुष्काळ दिसला होता. त्यानंतर अंतिम पैसेवारी काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता महसूल प्रशासनाकडून जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील ८४९६ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. दुसरीकडे पाणी साठ्यांची अवस्था ही बिकट आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता किती गंभीर राहील याचे संकेत मिळत असल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यात नुकतेच केंद्राच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड या चारही जिल्ह्यांत प्रातिनिधिक रूपात दुष्काळी परिणामाची पाहणी केली. त्यात शेतकऱ्यांनी पीक, पाणी, जनावरांचा चारा, कुटुंबाच्या अर्थकारण भागविण्यातील अडचणी, कर्जफेड करण्यातील अडचणी,

रब्बी पिकांवरील संकट आदी विषयाची मांडणी करून मायबाप सरकारने दुष्काळाच्या या संकटात भक्‍कम आधार देण्याची व पाण्याविना शेती शक्‍य नाही हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी केलेली त्यांच्या बिकट अवस्थेची मांडणी पाहता राज्य आणि केंद्र सरकार दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय उपाय योजते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तालुकानिहाय गावे व पैसेवारी

तालुका गावे पैसेवारी

अप्पर तहसील

छ. संभाजीनगर ४० ४८

हिंगोली १५२ ४९.२५

सेनगाव १३३ ४९.५३

कळमनुरी १४८ ४४.८९

वसमत १५२ ४९

औंढा नागनाथ १२२ ४७.७०

जिल्हानिहाय पैसेवारी ५० पैशांच्या

आत आलेल्या गावांची संख्या, पैसेवारी

जिल्हा गावे पैसेवारी

छत्रपती संभाजीनगर १३५६ ४५.५१

धाराशिव ७१० ४७.२८

बीड १३९७ ४६.४८

परभणी ८३२ ४७.६८

नांदेड १५६२ ४७.८७

जालना ९७१ ४६

हिंगोली ७०७ ४८.०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT