Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Seed Conservation : देशी वाणांचे दस्तऐवजीकरण गरजेचे

Indigenous Seed : भविष्यात जागतिक पातळीवर देशी वाणांचे महत्त्व वाढणार आहे. या वाणांचे संवर्धनात अनेक आदिवासी समाज पारंपरिक ज्ञानावर बीज संवर्धन करत आहेत.

Team Agrowon

Pune News : भविष्यात जागतिक पातळीवर देशी वाणांचे महत्त्व वाढणार आहे. या वाणांचे संवर्धनात अनेक आदिवासी समाज पारंपरिक ज्ञानावर बीज संवर्धन करत आहेत. मात्र त्यांच्याकडील ज्ञान आणि बियाण्यांच्या गुणधर्मासह दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे.

केवळ दस्ताऐवजीकरण नसल्याचा फटका आपल्या देशाला बासमती आणि हळदीच्या बाबतीत बसला आहे. मात्र आपण पेंटटच्या बाबतीत या दोन्ही लढाया जिंकल्या आहेत, भविष्यात आपल्या वाणांच्या पेंटटबाबत असे होऊ नये यासाठी दस्तऐवजीकरण गरजेचे आहे, असे मत बियाणे दस्तऐवजीकरण क्षेत्रातील अभ्यासक शमिका मोने यांनी व्यक्त केले.

गोएथ इन्स्टिट्यूट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च, ग्राम प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीजकथा परिसंवादातील दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २४) मोने बोलत होत्या. या वेळी अरुंधती म्हात्रे यांनी कथा व खेळामधून बियांची गोष्ट उलगडली.

नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्चच्या वतीने विविध वन्य बियांचे प्रदर्शन भरविले होते. याप्रसंगी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. एरिक भरूचा, डॉ. क्रांती यार्दी आदी उपस्थित होते. तर मोने यांनी देशभरात देशी वाणांच्या बियाण्यांचे संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करणाऱ्या विविध संस्था आणि कार्यकर्त्यांच्या माहितीचे सादरीकरण केले.

वन्य बियाण्यांचे विश्‍व खूप मनोरंजक आहे. या बियांविषयी लहान मुलांमध्ये कुतूहल जागृत करण्याची आवश्यकता आहे. कारण एक पंखी, दोन पंखी बिया असतात. त्या वाऱ्यावर उडत इकडे-तिकडे जातात. त्यातून त्यांची सर्वत्र रुजवण होते. आज मुलांना बियांची ओळखच नाही. ती करून देणे गरजेचे आहे.

बियांण्यांनादेखील पंख असतात आणि ती उडतात, याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले तर ते खूप मनोरंजक ठरते, असे अरुंधती म्हात्रे यांनी सांगितले. क्रांती यार्दी म्हणाल्या, की आम्ही नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्चमध्ये अनेक जंगली दुर्मिळ वृक्षांच्या बिया संकलित केल्या आणि त्यापासून रोपे तयार केली. त्याचे संवर्धन केले. याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना विविध उपक्रम घेऊन दिली जाते.

तर जंगल नष्ट होतील ः पाटील

देवरूख येथे हॉर्नबिल रोपवाटिका संकल्पना राबविणारे अभिजित पाटील म्हणाले, की कोकणातील हॉर्नबिलचा (धनेश) अधिवास धोक्यात आला आहे. हॉर्नबिल जंगलातील विविध फळे खाऊन, त्यांच्या विष्ठेद्वारे त्या फळांच्या बियांचा प्रसार करत असतो आणि या बिया नैर्सर्गिकपद्धतीने रूजतात आणि नवीन जंगले तयार होतात. यासाठी हॉर्नबील संवर्धनाची देखील गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT