Loan Waiver Promise Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

Loan Waiver: धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी एस.के.देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

Sainath Jadhav

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी एस.के.देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली. अजित पवार यांच्या सासुरवाडीतील रहिवासी असलेल्या देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर जोर देत सरकारच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

“कर्जमाफी केली नाही, तर मी पवारांची औलाद नाही,” या अजित पवार यांच्या शब्दांचा उल्लेख करत देशमुख यांनी कर्जमाफी का झाली नाही, असा थेट सवाल उपस्थित केला. सरकारच्या या मुद्द्यावरील टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांचा असंतोष वाढत असून, आता सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एस.के.देशमुख हे अजित पवार यांच्या सासुरवाडीतील रहिवासी असून, त्यांनी यावेळी आपला आक्रमक पवित्रा दाखवला. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. “शेतकऱ्यांपेक्षा कमी वयाच्या लोकांना सरकार मोठी पदे देते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलायलाही तयार नाही,” असे देशमुख यांनी ठणकावून सांगितले.

त्यांनी बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला आणि सरकार त्यांच्याबद्दलही मौन बाळगत असल्याची खंत व्यक्त केली.देशमुख यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कर्जमाफीबाबत मोठे आश्वासन दिले होते.

“अजितदादा म्हणाले होते, ‘कर्जमाफी केली नाही, तर मी पवारांची औलाद नाही,’ हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत. मग आता त्यांनी कर्जमाफी का केली नाही?” असा थेट सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांना दोनदा निवेदन देऊनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलने करत आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष वाढत असताना सरकार मात्र या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

धाराशिवमधील या घटनेने शेतकऱ्यांचा हा रोष पुन्हा एकदा समोर आला आहे. अजित पवार यांच्या सासुरवाडीतून आलेल्या या शेतकऱ्याने आपल्या मागण्यांवर ठाम राहत सरकारला जाब विचारला आहे. आता सरकार यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

Health Workers Issue : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

SCROLL FOR NEXT