Demand For Water Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Water Issue : पाण्यासाठी नाशिक, नगर, मराठवाड्यातून जोर

Irrigation Department : जायकवाडीत नगर, नाशिक भागांतील धरणांतून पाणी सोडण्याबाबत गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्या संचालकांनी दिलेल्या आदेशाचे अजूनही पालन झालेले नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जायकवाडीत नगर, नाशिक भागांतील धरणांतून पाणी सोडण्याबाबत गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्या संचालकांनी दिलेल्या आदेशाचे अजूनही पालन झालेले नाही. त्यामुळे तो आदेश बासनात गुंडाळून ठेवल्याची स्थिती आहे.

शिवाय या दरम्यान दोन्ही भागांतून पाणी मिळावे व न मिळावे यासाठी आपला जोर लावला जात आहे. दरम्यान, जायकवाडी मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज (ता. २०) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय नेते मंडळी यामध्ये सहभागी होणार आहेत.

अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखू

सर्व बाजू तपासल्यानंतर आदेश निघाले असतील तर त्याचे पालन करताना वेळकाढूपणा का केला जातोय का, असा प्रश्न मराठवाड्यातून उपस्थित होत आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात पाण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. आता सरकारला पाणी सोडण्यास भाग पाडण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारा १२ लाख टन ऊस रोखण्याचा इशारा घाटगे यांनी दिला आहे.

नगरमधून पाणी न सोडण्याची मागणी

मुळा, भंडारदरा, धरणातून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी देण्यास नगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केला आहे. नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, राहुरी तालुक्यांतील पाणी सोडण्यास विरोध करत आंदोलने केली. नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांनी तसेच लोकांनी केलेल्या मागणीनुसार समितीने ठराव केला. नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी केली आहे.

नाशिक जिल्ह्याचे निर्णयाकडे लक्ष

चार ऑक्टोबर २०२३ ला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मेंढीगिरी समितीच्या अहवालावर फेरविचारासाठी समिती नियुक्त केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पिण्याचे, औद्योगिक व शेतीच्या पाण्याचा विचार होण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व आंदोलक करत आहेत.

जायकवाडीसाठी नाशिक व नगरच्या धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशास स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे. संजय तुंगार, आर. डी. धोंगडे यांच्या याचिकेवर ५ डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होईल. त्यामुळे आता नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रत्येकवेळी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी भांडून घ्यावे लागत आहे. सरकारने मराठवाड्याच्या पाण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. सध्या मराठवाडा दुष्काळी स्थितीतून जात आहे. शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे.
सतीश घाटगे-पाटील, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना, जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT