Delhi Election Update agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Election Update : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ५ फेब्रुवारीला मतदान

Delhi Assembly Election : नामांकनाची तारीख १७ जानेवारी असून २० जानेवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेण्याची मुदत असणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

sandeep Shirguppe

Delhi Assembly Election Date : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. दिल्लीत एकाच टप्प्यात निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ७० विधानसभा जागांसाठी १० जानेवारी २०२५ पासून अधिसूचना जारी केली जाणार आहे. नामांकनाची तारीख १७ जानेवारी असून २० जानेवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेण्याची मुदत असणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार म्हणाले की, "दिल्लीत १ कोटी ५५ लाख अधिक मतदारांनी आपली नावे नोंदवली आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील २ लाख ८ हजार नवीन मतदार आहेत. दिल्लीत १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ८३० आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मतदार यादीत ही माहिती देण्यात आली आहे. भारत जगातील सर्वात जास्त मतदार असलेला पहिला लोकशाही देश बनणार आहे. सध्या देशात ९९ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. यांची संख्या १०० कोटी होणार आहे तर ४८ कोटींहून अधिक महिला मतदार आहेत. असे राजीव कुमार यांनी सांगितले.

त्रिशंकु लढतीने राजधानी दिल्लीचे राजकारण तापणार

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागली आहे. तर भाजपकडून सत्ताधारी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. तर काँग्रेस पक्षाकडूनही स्वबळावर लढण्यासाठी ताकद पणाला लावत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर अनेक आरोप झाल्याने यांच्या पक्षाला मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील आक्षेपांवर दिलं उत्तर

राजीव कुमार म्हणाले, "सेक्टर मॅजिस्ट्रेट बूथवर जातात, ते ट्रेंड कलेक्ट करतात. साडे दहा लाख बूथवर कनेक्टेड नसलेल्या मशिन्सचा डेटा गोळा करणं शक्य आहे का? पाच ते सात या वेळेत प्रीसाइडिंग ऑफिसर रांगेत असलेल्या मतदारांना सांगतात तुमचे मतदान होईपर्यंत मतदान बंद होणार नाही. तेव्हा कधी कधी वादही होतो. मतदान संपवतात आणि मशिन, बॅटरी सील केली जाते. अनेक फॉर्म भरले जातात. १७ सी भरल्यानंतर एजंटच्या हातात त्याची कॉपी दिली जाते. साडे दहा लाख बूथवर चार एजंट म्हटले तरी ४० लाख फॉर्म दिले जातात".

"महाराष्ट्रात १ लाख बूथ आहेत, तर एजंट्सना ४ लाख १७ सी फॉर्म दिले जातात. एका तासात ते फॉर्म बदलता येणं शक्य आहे का? प्रत्येक उमेदवार १७ सी फॉर्म त्यांच्या एजंटकडून गोळा करतात. त्यांना माहिती असतं कुठे किती मतदान झालंय? ६ वाजता मतदान संपल्यावर अर्ध्या तासात त्याची माहिती अपडेट होत नाही. जी माहिती अपडेट होते ती फॉर्म १७ सी वर दिलेली असते तशीच असते, कुणीही ते चेक करावं". असे आव्हान राजीव कुमार यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT