Horticulture Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Orchard : दुष्काळामुळे राज्याच्या फळबाग लागवडीत घट

Horticulture : सलग तीन वर्षांपासून देशाच्या फळबाग लागवडीत राज्याकडून विक्रमी लागवड चालू होती.

मनोज कापडे

Pune News : राज्याच्या फळबाग लागवडीला यंदा दुष्काळी स्थितीमुळे जोरदार ब्रेक लागला आहे. उद्दिष्टाच्या केवळ निम्मी लागवड झाली असून पाणीटंचाईच्या संकटातून नव्या बागा जगवताना शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे.

सलग तीन वर्षांपासून देशाच्या फळबाग लागवडीत राज्याकडून विक्रमी लागवड चालू होती. एरवी १५ ते २० हजार हेक्टरवर होणारी नवी लागवड कृषी विभागाच्या नियोजनामुळे २०२०-२१ मध्ये ३८ हजार हेक्टरवर पोहोचली होती.

त्यानंतर २०२२-२३ मधील लागवड थेट ४० हजार हेक्टरवर गेली. मात्र गेल्या २०२२-२३ मधील नव्या लागवडीने आधीचे सारे उच्चांक मोडून काढले. कारण गेल्या वर्षात राज्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ४४ हजार हेक्टरवर नव्या बागा उभारल्या होत्या.

राज्यातील फळबाग झपाट्याने विस्तारत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने लागवडीच्या योजना अजून सुटसुटीत केल्या. रोपवाटिकांपासून ते लागवडीपर्यंतच्या टप्प्यात अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबींना अनुदानाच्या कक्षेत आणले गेले.

विशेष म्हणजे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वतः राज्याच्या फळबाग अभियानाचा आढावा घेत उपयुक्त सूचना केल्या होत्या. लागवड अजून वाढण्याची शक्यता गृहीत धरत कृषी विभागाने यंदा २०२३-२४ साठी ६० हजार हेक्टरवर नव्या बागा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु दुष्काळामुळे केवळ ३२ हजार हेक्टरच्या आसपास लागवड झालेली आहे.

शेतकऱ्यांनी नव्या बागा लागवताना गादी वाफा, आच्छादन, ठिबक, फर्टिगेशन आणि अतिघन लागवड अशी पंचसूत्री स्वीकारली आहे. त्यामुळेच दुष्काळी स्थितीतही ३०-३२ हजार हेक्टर नवी लागवड होऊ शकली आहे. ‘‘शेतकऱ्यांनी भविष्यातील पाणीटंचाईचा अंदाज घेत नवी फळबाग लागवड आता थांबवली आहे.

लावलेल्या बागा दुष्काळापासून वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अर्थात, नवी लागवड करण्यात संरक्षित सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी आघाडीवर आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या कालावधीत देखील नव्या बागा तग धरतील, अशी आशा वाटते,’’ असे फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

...असे आहे फळबाग लागवडीचे चित्र (सर्व आकडे हेक्टरमध्ये)

- नव्या लागवडीचे उद्दिष्ट ः ६००००.

- प्रत्यक्षात झालेली लागवड ः ३२७००.

- सर्वाधिक लागवड झालेले फळ ः आंबा (१७०००).

- इतर फळांची झालेली लागवड ः काजू २७६९, चिकू १५५, पेरू ४२३, डाळिंब ७००, संत्रा ३२६२, मोसंबी ११६२, कागदी लिंबू ७२७.

- दुष्काळी स्थितीतही लावलेल्या नव्या फुलबागा ः निशिगंध १०८, गुलाब ५८, मोगरा ६४, सोनचाफा ४४.

राज्यात ७० हजार हेक्टरवर नव्याने फळबागा लावण्यासाठी यंदा ९० हजार अर्ज आले होते. फलोत्पादन विभागाने देखील यंदा उद्दिष्टापेक्षाही १०७ टक्के जादा प्रस्तावांना मंजुरी दिली होती. परंतु दुष्काळी स्थितीमुळे नवी लागवड ३४ हजार हेक्टरच्या पुढे जाऊ शकलेली नाही.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT