VSI Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Award : सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धनासाठी दत्त कारखान्यास प्रथम पुरस्कार

Vasantdada Sugar Institute : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ यांनी २०२३-२४ मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Team Agrowon

Kolhapur News : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ यांनी २०२३-२४ मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्यातर्फे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक व संचालकांसमवेत पुरस्कार स्वीकारला.

ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीने ऊस बियाणे बदलावर भर देऊन ऊस विकास योजनेसाठी अंदाजपत्रकामध्ये कारखान्याने निधीची तरतूद केलेली आहे. कारखान्याच्या वतीने एकरी उसाचे उत्पन्न वाढावे याकरिता वेळोवेळी शेतकरी मेळावे व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले, बाबासाहेब पाटील, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्हीएसआयचे महाव्यवस्थापक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त शिवाजी देशमुख आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT