Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : संभाव्य पावसावर रब्बीच्या आवर्तनाची भिस्त ः पवार

गणेश कोरे

Pune News : हवामान विभागाने दोन चक्रीवादळे तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे पाऊस पडू शकतो असे सांगितले आहे. त्यानुसार पुढील काळात किती पाऊस पडतो हे पाहून सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या तारखा लवचीक ठेवाव्या लागेल.

तसेच कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून, आगामी काळात किती पाऊस पडतो याआधारे या वेळापत्रकात कमीअधिक बदल करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत निश्चित करण्यात आले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी (ता. २०) झालेल्या या बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, संजय शिंदे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘जुलै २०२४ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. उर्वरित पाणी रब्बी पिकांना देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच टँकरसाठी पाणी स्त्रोत आदींचे नियोजन करावे लागणार आहे.’’

कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे तातडीने करून घ्या. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. पाणीपट्टी वसूल करून त्यातील ठरावीक रक्कमेतून पोटचाऱ्या दुरुस्ती करून घ्याव्यात, पाणीवापर संस्थांनाही फाटे, चाऱ्या स्वच्छ करण्यास सांगावे. चार तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी पवार यांनी दिल्या.

घोड प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड उजवा व डावा कालव्यातून रब्बीची दोन आवर्तने आणि उन्हाळी एक आवर्तनाचे नियोजन असून पहिले आवर्तन २५ डिसेंबरच्या आसपास सोडण्यात येईल, असे या वेळी निश्चित करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कमी पावसामुळे जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींमध्ये पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा सुमारे सव्वा मीटरने खाली गेल्याचे सांगितले. या वेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी तसेच आमदारांनी विविध सूचना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Rate : डाळिंबाचे दर स्थिर

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेची वैधता काय?

Soybean Rate : सोयाबीनचा सरासरी दर चार हजारांच्या आत

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

SCROLL FOR NEXT