Crop Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : सततच्या पावसामुळे पिके पिवळी

Crop Issue : लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचून त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला असून पिके पिवळी पडत आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. दहा दिवस झाले तरी सूर्यदर्शन झाले नाही. यामुळे शिवारात पाणी साचून त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला असून पिके पिवळी पडत आहेत. आणखी चार दिवस असाच पाऊस राहिला, तर पिके हातची जाण्याची भीती आहे. दरम्यान, पावसाने गुरुवारी (ता. २५) रात्रीपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला तरी पावसाचा काही नेम नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.

यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस पडत आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांत खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात शंभर टक्के पेरण्या उरकल्या असून धाराशिव जिल्ह्यात खरिपासाठी निश्‍चित केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

वेळेवर पाऊस झाल्याने यंदा पिके चांगली असून, प्रमुख पीक असलेले सोयाबीन बहरात आहे. यंदा चांगल्या उत्पन्नाच्या आशा असतानाच काही दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचे पाणी शिवारात साचून राहत असून त्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. अशीच परिस्थिती आणखी चार दिवस राहिली तर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत असून, गुरुवारी रात्रीपासून पावसाने उघडीप दिली असून, शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस पडला नव्हता. काही भागात सूर्यदर्शनही झाल्यामुळे आणखी तीन दिवस पाऊस पडला नाही तर पिकांची परिस्थिती पहिल्यासारखी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यांत पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

नुकसानीसाठी वेट अँड वॉच

लातूर जिल्ह्यात पावसामुळे पिके पिवळी पडली असून, पिकांच्या नुकसानीबाबत अजून निश्‍चित सांगता येत नाही. जिल्ह्यात पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातही पिके पिवळी पडली असून, पावसाने उघडीप दिली तर ती सावरू शकतात. पिके वाहून जाण्यासारखा पाऊस झालेला नाही. सध्या तरी पाऊस उघडला असून, तो पुन्हा चार दिवस राहिला तर मात्र पिकांचे नुकसान होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT