Latur News : लातूर जिल्ह्यात खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात पीक कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असले तरी या वर्षी आत्तापर्यंत तीनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी आहे.
या बँकेने उद्दिष्टाच्या ९६ टक्के कर्ज वाटप केले आहे. व्यापारी व इतर बँकांनी उद्दिष्टाच्या ३५ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकेने मात्र हात आखडता घेतला असून या बँकेचे केवळ १७ टक्केच कर्जवाटप झाले आहे.
एकूण जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सहाशे कोटीचे उद्दिष्ट होते त्या पैकी ५० टक्के म्हणजे ३०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँका व ग्रामीण बँकेच्या माध्यमातून पीककर्जाचे वाटप केले जाते.
जिल्ह्यात खरीप हंगामात पीककर्जाला अधिक मागणी असते. त्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र कमी असल्याने या हंगामात पीककर्जाला मागणी कमी असते तरी देखील जिल्ह्यात तीनशे कोटीचे कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात दोन हजार ३९९ कोटी ९९ लाख रुपये कर्जाचे उद्दिष्ट होते.
यात एक लाख ६५ हजार ८४ सभासदांना दोन हजार ३९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टांच्या ९९.५८ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या १६४.३६ टक्के कर्जाचे वाटप केले आहे.
व्यापारी बँकांनी ५६ टक्के तर ग्रामीण बँकेने १०३.३६ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामासाठी ५९९.९८ कोटीचे उद्दिष्ट होते. यात १२ हजार ४२३ हेक्टर क्षेत्रासाठी ३२ हजार ६६९ सभासदांना २९९ कोटी ९३ लाख पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.