Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

Crop Insurance Compensation : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांनी गुरुवारी (ता. ९) पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांपैकी ३४ मंडले अतिवृष्टीत बाधित झाली. अन्य मंडलांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.

१ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी शासनाने १६४ कोटींची मदत मंजूर केली. मात्र, रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही.

त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी उपोषण सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासह विविध संस्था संघटनाकडून त्यास पाठिंबा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT