Banana Crop Cover Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming Technique : केळी रोपे वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर वाढला

Banana Crop Cover : एप्रिल-मे-जूनमधील तीव्र उष्णतेचा रोपांना सामना करावा लागू नये यासाठी क्रॉप कव्हर तसेच इतर एकात्मिक उपाययोजनांवर शेतकरी जोर देत असल्याचे दिसून येते.

Team Agrowon

Akola News : आपण पिकविलेल्या मालाला कुठल्या काळात बाजारपेठेत दर मिळतात याचा अभ्यास आता तरुण पिढी करते आहे. यामुळेच केळीच्या रोपांची मार्च-एप्रिलमध्ये लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. एप्रिल-मे-जूनमधील तीव्र उष्णतेचा रोपांना सामना करावा लागू नये यासाठी क्रॉप कव्हर तसेच इतर एकात्मिक उपाययोजनांवर शेतकरी जोर देत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेऊ लागले आहेत. केळी लागवड पावसाळ्यात म्हणजेच जून-जुलैमध्ये केली जात होती. हा कालावधी योग्य मानला जात होता. पण आता ठिबक सिंचन व पुरेशा पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी फेब्रुवारी ते मार्च या काळात लागवड करू लागले आहेत. या बागेतून येणाऱ्या मालाला चांगला दर मिळत असतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

मात्र या लागवडीच्या रोपांना रखरखत्या उन्हाच्या झळा सर्वाधिक सोसाव्या लागतात. यावर उपाय म्हणून शेतकरी केळीची रोपे तापमानापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करू लागले. या पद्धतींमुळे रोपांचा उष्णतेपासून बचाव करण्यास मदत होते, अशी माहिती हिंगणी (ता. तेल्हारा) येथील उद्यानपंडित शेतकरी सचिन कोरडे यांनी दिली.

केळी हे पीक दमट हवामान व मध्यम तापमानात येणारे आहे. तरिही तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांनी अतिशय कोरड्या व उष्ण वातावरणात वर्षानुवर्षे दर्जेदार केळीचे उच्चांक स्थापित केले आहेत. यंदा मार्चपासूनच तापमानाने चाळिशी पार केली असल्याने एप्रिल-मे मधील केळी लागवड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

असा आहे कोरडे यांचा अनुभव

केळीच्या रोपाभोवती ताग (बोरू) लावला की सावलीमध्ये केळीच्या रोपांची लागवड करावी. यासाठी रोप लागवडीपूर्वी महिनाभर आधी ताग लागवड करा. जेणेकरून सावलीमुळे कोवळ्या केळीरोपांचे उष्णतेपासून संरक्षण होईल. जमिनीतील ओलावा टिकून राहील. तसेच केळी रोपाच्या चोहोबाजूंनी १२ ते १४ इंच उंच प्लॅस्टिकचे कव्हर लावून रोपाला वरून टोपी घालावी. जेणेकरून जमिनीचा ओलावा व ठिबकच्या पाण्याने आर्द्रता तयार होऊन रोपांचा उष्णतेपासून बचाव होईल.

यापैकी कोणतीही व्यवस्था नसेल तर कापणी झालेल्या केळी बागेतील हिरवी पाने वापरावीत. ही पाने रोपांना सावली मिळेल अशा पद्धतीने जमिनीत उभी ठेवावीत. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास तण नियंत्रण होते. पाण्याची बचत, जमिनीचे तापमान नियंत्रण आणि कीड-रोग नियंत्रणासाठी होतो.

मातीला आच्छादन दिल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते, काही कीटक आणि रोगांना रोखण्यास मदत करते, ज्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते. शेतीमालाची गुणवत्ता सुधारते, तसेच उत्पादनामध्ये वाढ होते, अशी माहिती सचिन कोरडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ ९९.२८ टक्क्यांवर

ISO Certification: महावितरणच्या सहा कार्यालयांना एका वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

Youth Empowerment: राज्यात ७५ हजार युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

SCROLL FOR NEXT