Nana Patole
Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : महायुती सरकारचे धोरण दूध उत्पादकांसाठी मारक : दूध भुकटी आयातीवरून पटोले यांची टीका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी दुधाचे पडणाऱ्या भावामुळे त्रस्त झाला आहे. यामुळे शेतकरी आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. याचदरम्यान  केंद्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याला तारण्याऐवजी मारक निर्णय घेतला. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी (ता.३०) राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पटोले यांनी, राज्य सरकारसह केंद्र सरकार शेतकरीविरोधी आहे. या निर्णयाचा दूध उत्पादकांना कोणताच फायदा होणार नाही. उलट तो दूध उत्पादकांसाठी मारक आहे. या निर्णयाचा अमूलला कसा फायदा होईल, हाच विचार सरकार करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. 

गेल्या काही महिन्यापासून राज्यात दुधाचे दर कोसळत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच सर्वांत कमी दुधाचे दर आहेत. दुधाला ३५ रुपये भाव मिळावा यासाठी आता राज्यभर आंदोलने होत आहेत. अशावेळी सरकारने दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. केंद्राने दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला दूधउत्पादकांचा व विरोधकांचा विरोध होत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दूध उत्पादक घाईला आल्याचे पटोले म्हणाले. 

दूध कंपन्या शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध विकत घेऊन ४० ते ४५ रूपये प्रति लिटर विकत आहेत. कंपन्या नफा मिळवत आहेत. पण याचा फटका दूध उत्पादकांना बसत असल्याचेही पटोले यांनी म्हटलं आहे. 

राज्यात दुधाचा दर सर्वांत कमी असताना त्यावर कोणताच निर्णय सरकार घेत नाही. उलट अमूलच्या फायद्यासाठी दूध भुकटीची आयात केली जात असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला आहे. अमूलसारख्या कंपन्या शेतकऱ्यांचे नुकसान करत असून यावर सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. महायुतीचे सरकार गुजरातधार्जिणे असल्याचा टोला पटोले यांनी लगावताना दुधाला प्रति लिटर ४० रू भाव द्या, अशी मागणी केली आहे. 

हजारो टन दूध पावडर पडून

राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारकडून ती घेतली जात नाही. आता फक्त अमूलसाठी दूध पावडर आयात शुल्क करत आयात केली जात आहे. सरकारचा हा निर्णय दूध उत्पादक व दूध संघ यांचे कंबरडे मोडणारा असल्याचेही पटोले म्हणाले. 

शरद पवार यांना निवेदन

दरम्यान केंद्र सरकारच्या दूध पावडर आयात निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी याबाबत निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोल्हापुरमध्ये असताना विश्वास पाटील यांनी निवेदन दिले. राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकार दूध पावडर आयात करत आहे. केंद्राचा आयातीचा निर्णय दुग्ध व्यवसायाला मारक असून दूध दरावर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे तो रद्द करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’ची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा

Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

Shetkari Samman Nidhi : नगरला ‘शेतकरी सन्मानच्या' कामावर ‘कृषी’चा बहिष्कार

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT