Ravikant Tupakar  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Farmer : कापूस, सोयाबीन उत्पादक आज करणार मुंबईकडे कूच

Farmers Protest : सोयाबीन-कापूस उत्पादकांचे मूलभूत प्रश्‍न व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

Team Agrowon

Buldana News : सोयाबीन-कापूस उत्पादकांचे मूलभूत प्रश्‍न व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज (ता. २८) तुपकर हे सोयाबीन, कापूस उत्पादकांसह मुंबईकडे कूच करणार आहेत.

सोमवारी (ता. २७) रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सोमठाणा येथे भेट देत तुपकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच आंदोलनाला पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही दूरध्वनीवरून चौकशी करीत आंदोलनाबाबत माहिती घेतली.

सोयाबीन, कापसाला योग्य भाव, दुष्काळाची घोषणा, पीकविम्याची मदत, बचत गटांना कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला.

त्यानंतर त्यांनी मागण्यांबाबत शासनाने दखल न घेतल्यास उद्या (ता. २९) मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तयारी सुरू असतानाच पोलिसांनी तुपकर यांना अटक केली. न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवीत जामिनावर त्यांची सुटका केली.

यानंतर तुपकर यांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन कायम ठेवत आज (ता.२८) ते शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली. आज सकाळी बुलडाण्यातील परतून तेथून हजारो शेतकरी वाहनांद्वारे मुंबईला जाणार आहेत.

आंदोलनाला वाढता पाठिंबा

श्री. तुपकर यांच्या आंदोलनातील मागण्यांबाबत विविध पक्षांच्या नेत्यांकडून पाठिंबा जाहीर होत आहे. सदाभाऊ खोत, एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला. ‘‘शेतीमालाला भाव मिळत नाही. सध्याचे शासन हे संवेदनाहीन आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपापसांत माऱ्यामाऱ्या सुरू आहेत. शासनाकडे संवेदना नसल्याने कायम स्वरुपी अन्नत्यागासारखे आंदोलन करणे योग्य नाही. याबाबत येत्या काळात जाब विचारू,’’ असे खडसे म्हणाले.

आम्ही बरोबर ः खोत

‘‘तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आम्ही बरोबर आहोत. महाराष्ट्रात या लढ्याचे गांभीर्य पोचले. लढाई लढताना तुरुंगवास, पोलिस कारवाई होतच असते. प्रस्थापितांना नेहमी वाटते विस्थापितांनी न्याय मागू नये. आमची गुलामगिरी स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर ते काही विदेशात जाणार नाहीत.

या पैशातून तो कुटुंबाच्याच गरजा पूर्ण करतो. म्हणजेच पैसा येथेच खर्च होतो. कापसाला, सोयाबीनला भाव मिळाला तर तो पैसा सर्वांच्या घरातच जातो. म्हणूनच त्याला बळीराजा म्हणतात. तुम्ही जे आंदोलन छेडले, त्यात गोरगरीब जनतेचा, शेतकऱ्यांचा निश्‍चित विजय होईल,’’ असा विश्‍वास खोत यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wedding Code of Conduct: लग्नातील आचारसंहितेची सुरुवात नेत्यांपासूनच व्हावी

Suresh Dhas: धस यांचे कृषी सचिवांना पत्र

Silk Cocoon Market: बीडमध्ये विक्रमी दीड लाख किलो रेशीम कोषांची आवक

CM Devendra Fadnavis: तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा: मुख्यमंत्री

Humani Pest: परभणीत हुमणीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT