Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर ः राज्यात यंदा पाऊसमान चांगले असल्याने खरिपाची पिके चांगली आली आहेत. कापूस वेचणीला आला असतानाच पाऊस झाल्याने फुटलेल्या कापसाला बाधा निर्माण झाली आहे. बोंडाबाहेर आलेला कापूस पावसाने काळा पडला आहे. त्यामुळे दरात फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या बहुतांश भागात कापसाची वेचणी सुरू झाली. मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा दोन ते तीन रुपयांनी प्रति किलोमागे वेचणीचा दर वाढला आहे. त्यामुळे यंदा चांगली स्थिती दिसत असली तरी कापूस उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.

राज्यात कापसाचे ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. या वर्षी ४० लाख ८५ हजार ९८६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या ९७ टक्के कापूस लागवड झाली होती. त्यात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, वर्धा, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यांत कापसाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. यंदा पावसाची स्थिती सुरुवातीपासून चांगली असल्याने लवकर लागवड झाली. त्यामुळे आता कापूस वेचणीला आला आहे. मराठवाडा, विदर्भासह अहिल्यानगर जिल्ह्यांत कापसाच्या वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र मागील आठ दिवसांत अनेक भागांत अचानक पाऊस झाला. त्या पावसाने बोंडातून फुटलेला कापूस काळा पडला आहे. त्यामुळे पहिल्याच वेचणीच्या कापसाला दरात फटका सोसावा लागण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे.

मातीमोल दराने खरेदी

कापसाची वेचणी झाल्यानंतर दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शेतकरी कापसाची विक्री करतात. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत कापसाची विक्री सुरू झाली आहे. सरकारी खरेदी केंद्र सुरू झाली की नाही, होणार आहेत का आणि खरेदी केंद्रे सुरू होणार असतील तर ती कधी होणार याबाबत सरकारी पातळीवर काहीही माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून मात्र मातीमोल दराने खरेदी केली जात आहे. सध्या अनधिकृतपणे कापूस खरेदी करणारे व्यापारी सहा हजारांपर्यंतच दर देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आम्ही दर वर्षी कापसाचे उत्पादन घेतो. यंदा वरवर कापसाची चांगली स्थिती दिसत असली तरी कापसाचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने दर कमी मिळण्याची भीती आहे. वेचणीलाही मजूर मिळेनात, दर वाढवून मागत आहेत. त्यात बाजारात कापसाला मातीमोल दराने विकावे लागत असल्याची स्थिती असल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.

- मधुकर म्हसे, कापूस उत्पादक शेतकरी, राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

Nanded Agriculture Department : नांदेड जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने विभागाला संजीवनी

SCROLL FOR NEXT