Jalna News : पावसाळ्यातील ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत शासनाकडे प्रलंबित आहे. जवळपास सहा महिन्यांपासून सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याचे दिलेले आश्वासन निवडणुकीनंतर प्रशासन विसरल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे आगामी खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत असून सदर अनुदान केव्हा मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना अद्यापही गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही. ही रक्कम जवळपास १३९ कोटीच्या घरात आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वीच पीकविम्यासह अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान भरपाई व तत्सम शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेत कर्जमाफीची मागणी करीत राजकीय पक्षांनी शेतकरी मतदारांकडे लक्ष केंद्रीत केले होते.
परंतु, महसूल प्रशासनाकडून केवळ याद्या तयार करणे, त्या याद्यांचे वाचन करणे, अपलोड करणे, व्ही.के. क्रमांक मिळवणे व त्यानंतर या याद्या शासनाच्या वेबसाइट अपलोड करण्याचे काम करीत आहे.
घनसावंगी तालुक्यात झालेले नुकसान
घनसावंगीच्या ११७ गावांतील ७५ हजार ८६२ शेतकऱ्यांच्या नुकसान झाले होते. जिरायतीचे ७१ हजार २४३ हेक्टर, बागायतीचे ३८९ हेक्टर, फळबाग क्षेत्रांचे ११ हजार ४३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
या पिकांच्या नुकसानीपोटी जिरायती हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायती हेक्टरी २७ हजार रुपये, तर फळबाग ३६ हजार रुपये हेक्टर एकूण १३९ कोटी ११ लाख ७५ हजार ८०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.