Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : ‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’ योजनेमुळे अनेक प्रश्न निकाली

Farmer Justice : ‘‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’ योजनेमुळे अनेक प्रश्न निकाली’ या उपक्रमामुळे सोमवारी (ता.७) अनेक नागरिकांचे तत्काळ प्रश्न निकाली निघाले. त्यात प्रामुख्याने शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, जमिनीच्या मोजणीचे प्रलंबित प्रकरणे, फेरफार प्रकरणेशा एक ना अनेक समस्या निकाली काढण्यात आल्या.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर ः ‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’ या उपक्रमामुळे सोमवारी (ता.७) अनेक नागरिकांचे तत्काळ प्रश्न निकाली निघाले. त्यात प्रामुख्याने शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, जमिनीच्या मोजणीचे प्रलंबित प्रकरणे, फेरफार प्रकरणेशा एक ना अनेक समस्या निकाली काढण्यात आल्या.

अनेक प्रकरणांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत आहे. त्यासाठी संबंधितांनी आपले ई- केवायसी लगेचच करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. ‘जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी तहसील कचेरी येथे आलेल्या अभ्यागतांना दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे कष्ट घ्यावे लागू नये तसेच त्यांचा खर्च व वेळ वाचावा म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात न येता आपल्या तक्रारी, निवेदने हे तहसीलदार कचेरीत दर सोमवार व गुरुवारी सादर करावे. अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे मुख्यालयातून तर सर्व उपविभागीय अधिकारी, तदूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

ही प्रकरणे निकाली सिल्लोड तालुक्यातील सदाशिव बिरगे (रा. शिरसाखेडा) यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान प्रलंबित होते. त्यासाठी ई-केवायसी झालेले नव्हते. ते झाल्यास लगेच खात्यात परस्पर पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. तसेच लीलाबाई कांबळे, कमलाबाई लोखंडे यांच्या शिधापत्रिकांचा प्रश्न होता. त्यांना आजच शिधापत्रिका देण्यात आल्या.

घाटनांद्रा येथील  अमोल मोरे यांच्या सातबारा उताऱ्यावर दिसणारा बॅंक कर्जाचा बोजा कमी करावयाचा आहे, त्यासाठी तहसीलदार यांनी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. खुलताबाद येथील सुनील जाधव (रा. कवीटखेडा) यांच्या शिधापत्रिकेचा प्रश्नही लगेचच निकाली काढण्यात आला.

फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील समीर पठाण यांच्या तुकडेबंदी अंतर्गत जमीन मोजणीसंदर्भात पत्र देण्यात आले. हा प्रश्न गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित होता. तेथीलच जनाबाई देवकर यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान ई-केवायसी अभावी रखडले असून त्यांचेही केवायसी करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT