Weather News  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : खानदेशात ढगाळ वातावरण; पावसाच्या अंदाजामुळे चिंता

Weather Forcasting : खानदेशात मागील काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरण आहे. केळी, कलिंगड व इतर फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती असून, निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव : खानदेशात मागील काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरण आहे. केळी, कलिंगड व इतर फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती असून, निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. यातच पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे संकेत काही हवामान अभ्यासकांनी दिल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

खानदेशात यंदा थंडी कमी-अधिक आहे. मध्ंयतरी किमान तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. आता त्यात वाढ झाली. किमान तापमान सहा अंश सेल्सिअसने वाढले. सातपुड्यातही थंडीचे आगमन झाले. सातपुड्यात दवबिंदू गोठविणारी थंडी होती. अक्कलकुव्यातील दाब व परिसरात किमान तापमान सहा अंश सेल्सिअसखाली पोहोचले होते. यंदा हुडहुडी भरविणारी थंडी आली.

यातच मागील आठवड्याच्या अखेरीस ढगाळ वातावरण सतत तयार झाले आहे. नोव्हेंबरमध्येही काही दिवस सतत ढगाळ व पावसाळी वातावरण होते. यानंतर डिसेंबरमध्ये काही दिवस निरभ्र वातावरण होते. थंडीही होती. डिसेंबरअखेरीस पाऊस झाला. त्यानंतर अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होतच राहिले. यामुळे थंडीला अडथळा आला. रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर ज्वारी व इतर पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. परंतु यंदा सलग चार पाच दिवस किमान तापमान सात अंश सेल्सिअसखाली आलेच नाही. यामुळे रब्बी हंगाम हवा तसा नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी भाजीपाला, फळ पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यात केळी, पपईची काढणी सुरू आहे. अनेकांची केळी निसवणीवर असून, काही भागात केळी पीक दोन ते एक महिन्याचे आहे. कलिंगड, कारली, गिलके, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांची लागवडदेखील झाली आहे. यंदा कलिंगडाची लागवडदेखील अनेक भागात प्रतिकूल स्थितीमुळे कमी झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी लागवड करून पीक वाढविले. अशातच सतत पावसाचे अंदाज, ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. अशात पाऊस आल्यास मोठी वित्तीय हानी होईल, अशी भीती आहे.

दुपारी उकाडा
खानदेशात सध्या सकाळी थंडी व दुपारी उकाडा असतो. अंशतः ढगाळ वातावरण असते. काही वेळेस दुपारी वारा सुटतो. पहाटेदेखील वारा असतो. यामुळे शेतकरी निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. निरभ्र वातावरणात थंडीही वाढेल व पिकांवरही प्रतिकूल परिणाम कमी होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुढे पाऊस आल्यास कलिंगड, खरबूज आदी पिकांची हानी होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT