Chilli Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Chilli Cultivation : खानदेशात मिरची लागवड सुरू

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मिरची लागवड सुरू झाली आहे. मिरचीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारातील लागवड यंदा अडीच हजार हेक्टरवर स्थिर राहणार आहे. लागवडीसाठी आखूड व तिखट, लांब प्रकारच्या मिरची वाणांना शेतकरी पसंती देत आहे.

मिरचीची सर्वाधिक अडीच हजार हेक्टरवर लागवड नंदुरबारात केली जाईल. यंदा नंदुरबार तालुक्यातील लागवड काहीशी कमी होईल. कारण दुष्काळी स्थितीचा फटका सर्वाधिक नंदुरबारला बसला आहे. अनेक शेतकरी क्षेत्र कमी करतील, अशी स्थिती आहे. तापी काठी लागवड मात्र बऱ्यापैकी होईल. नंदुरबारात लागवड काही शेतकरी कमी करतील, परंतु तळोदा, शहादा भागात लागवड वाढणार आहे.

यापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर व साक्री भागातही मिरची लागवड होईल. या भागातील लागवडही मिळून सुमारे ५०० हेक्टरवर होवू शकते. सर्वाधिक लागवड साक्री, शिंदखेडा व शिरपूर भागात होईल. जळगाव जिल्ह्यातील लागवडही सुमारे ४०० हेक्टरवर स्थिर राहील. जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, पारोळा, एरंडोल, यावल, भुसावळ व मुक्ताईनगर या भागात मिरची लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड जामनेरात केली जाते.

लागवडीसाठी मागील महिन्यातच किंवा कोरड्या वातावरणात शेतकऱ्यांनी पूर्वंमशागत केली. यानंतर गादीवाफे तयार करून त्यात खतांचा बेसल डोस टाकला. लागलीच त्यावर पॉलीमल्चिंग पेपर अंथरूण घेतला. जूनच्या सुरवातीला किंवा दुसऱ्या आठवड्यात खानदेशात मिरची लागवड सुरू होते. अनेक शेतकरी एक पाऊस आल्यानंतर लागवड करतात. तर काही शेतकरी पाऊस येण्यापूर्वीच गादीवाफे चांगले भिजवून लागवड करतात.

प्रतिरोप एक ते दीड रुपयांचा दर

लागवडीसाठी अधिकतम शेतकरी रोपांचा उपयोग करतात. त्यासाठी नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील रोपवाटिकांमधील रोपांचा उपयोग केला जातो. रोपांचे दर एक ते दीड रुपये प्रतिरोप, असे आहेत. काही रोपवाटिकांतील दर दोन रुपयांपर्यंत आहेत. रोपांच्या दरात मागील वर्षी व यंदाही किंचित वाढ झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी रोपांचे दर एक ते सव्वा रुपये प्रतिरोप, असे होते.

मिरचीचा मागील हंगाम कमी नफ्याचा

मिरचीचा हंगाम मागील वेळेस हवा तसा नफ्यात राहिला नाही. खर्च केला, तोच हाती आला. फारसा नफा नसतानाही शेतकरीराजा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. मिरचीची खानदेशात थेट खरेदी नंदुरबारात केली जाते. तर काही शेतकरी बाजारात विक्री करतात. हिरव्या मिरचीला मागील वेळेस सरासरी दर 20 रुपये प्रतिकिलो, असा मिळाला. तर वाळविलेल्या लाल मिरचीस 3300 रुपयांपासून ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. यंदा नफा चांगला राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्य

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

SCROLL FOR NEXT