Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rainfall : मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

CM Eknath Shinde : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Swapnil Shinde

Unseasonal Rains : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कापूस, भात, तूर, द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा यासहित इतर जिल्हांनाही तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. तर कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅप किंवा 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरुपात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT