Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : नद्यांमधील गाळ निघण्याची शक्यता धूसर, पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा?

sandeep Shirguppe

Kolhapur Panchaganga Flood : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही वर्षात महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर नदी, नाले, तलावातील गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा गाळ काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे १६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती; परंतु सरकारकडून अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे यंदा नद्यांमधील गाळ निघण्याची शक्यता धूसर झाली आहे. याचा थेट परिणाम यंदा होणाऱ्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून याबाबत प्राथमिक स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे या पावसाळ्यापूर्वीही नद्यातील गाळ काढण्याच्या कामाला मुहूर्त लागणार नाही.

कोल्हापूरला दरवर्षी पूर व महापूर हा ठरलेलाच आहे. या महापुरासाठी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे नदी, नाले यामधील गाळ आहे. तज्ज्ञ अभ्यासक व शासकीय यंत्रणेच्या अभ्यासातून हे पुढे आले आहे. गाळ काढून महापुराची तीव्रता थोडी कमी होऊ शकते, असे अनुमान आहे.

त्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनस्तरावर बराच उहापोह झाला आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल रेखावार, सचिव शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

बैठकीत निधी मागणीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे १६० कोटी रुपयांच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्य सरकारकडे निधी मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला; परंतु अद्याप निधी मिळालेला नाही.

निधी उपलब्ध झाल्याशिवाय या कामाला सुरुवात होऊ शकत नाही. हा निधी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून नव्याने गाळ काढण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ निघणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

गाळ काढण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी होत आहे. गाळ काढल्याने नदीची वहन क्षमता चांगली होऊन पूर कमी होईल, असे काही लोकांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. संबंधित यंत्रणेकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले जाणार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता कमी आहे.

स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT