Cashew Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Production : काजू बी उत्पादन २० टक्केच ; अतितापमान, धुक्याचा परिणाम; प्रति किलोला १७५ रुपये दर

Cashew Farming : सततचे धुके आणि ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले तापमान यामुळे काजूला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर करपला आहे. त्यामुळे या वर्षी काजू बीचे २० टक्केच उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी ः सततचे धुके आणि ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले तापमान यामुळे काजूला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर करपला आहे. त्यामुळे या वर्षी काजू बीचे २० टक्केच उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात या वर्षी चांगली थंडी होती. थंडीचा कालावधी देखील अधिक राहिला. त्यामुळे काजू झाडे मोहराने पूर्णपणे बहरली. पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत प्रचंड मोहर आला. त्यामुळे काजू उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येणारा मोहर या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत आला. पहिल्या टप्प्यात आलेला मोहर अधिकच्या धुक्यामुळे काळवंडला. ज्या शेतकऱ्यांनी कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या त्यांचा ३० ते ४० टक्के मोहर टिकला.

परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात आलेला मोहर मात्र पूर्णतः करपून गेला. दहा ते पंधरा दिवस सतत धुके पडले. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात तापमानवाढीच्या झळा काजूच्या मोहराला बसू लागल्या. ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहिल्याने उन्हांमुळे उरलासुरला मोहर काळवंडून गेला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील किरकोळ मोहरापासून फळधारणा झालेली बी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या बीचे प्रमाण हे २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमीच राहणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत आलेल्या मोहरापासून ५ टक्केदेखील उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार नाही. अति तापमानवाढीचा मोठा फटका या पिकाला बसला आहे.


दरात अजून सुधारणा होण्याचा अंदाज
काजू बी उत्पादन कमी येणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे या वर्षी काजू बीचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या काजू बी प्रतिकिलो १६० ते १७५ रुपये दराने खरेदी केली जात आहे. मार्च निम्मा संपला तरी आठवडा बाजारामध्ये काजू बीची आवक होताना दिसत नाही. त्यामुळे काजू बीच्या दरात अजून सुधारणा होण्याचा अंदाज आहे.


सततचे धुके, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ आणि प्रचंड तापमानवाढ याचा मोठा परिणाम काजूच्या उत्पादनावर झाला आहे. या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फवारण्या केल्या त्यांना २० टक्के उत्पादन मिळणार आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना ५ ते १० टक्के उत्पादन देखील मिळण्याची शक्यता कमी आहे.
- आकाश नरसुले, काजू उत्पादक, कुडासे, ता. दोडामार्ग 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

SCROLL FOR NEXT