Delhi Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers Protest : शेतकरी संघटनांचा आज ‘काळा दिवस’

Team Agrowon

Farmers Protest Update : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत असून खानौरी सीमेवर आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत एका तरुण शेतकऱ्याचा बुधवारी (ता. २१) मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २३) देशभर काळा दिवस पाळण्यात येणार असून १४ मार्चला रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा किसान मोर्चाकडून गुरुवारी (ता. २२) करण्यात आली.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित केला असून शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे २५ ते ३० ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांचे नुकसान केल्याप्रकरणी हरियानातील निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंधेर यांनी केली. दरम्यान, पंजाब- हरियानाच्या खानौरी सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता तर बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

शुभकरन सिंग (वय २१) असे मरण पावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो भटिंडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पतियाळामध्ये माध्यमांशी संवाद साधताना पंधेर म्हणाले, की हरियाना सुरक्षा दलाचे कर्मचारी हे पंजाबच्या हद्दीमध्ये प्रवेश करत असून खानौरी सीमेवर त्यांच्याकडून दडपशाही सुरू आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब सरकारने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.

‘शुभकरन सिंगला हुतात्म्याचा दर्जा बहाल करण्यात यावा,’ अशी मागणी शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी केली आहे. या शेतकऱ्याच्या निधनावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शोक व्यक्त केला असून शवविच्छेदन पार पडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. या शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे मान यांनी स्पष्ट केले.

सरकार चर्चेस नेहमीच तयार

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की शेतकरी हे देशाचे ‘अन्नदाता’ आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चेसाठी नेहमीच तयार आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बुधवारी (ता. २१) म्हणाले, की एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना विविध ‘हमी’ देत असले तरी दुसरीकडे वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

आज देशात शेतकरी अडचणींचा सामना करत आहेत. तो कठोर परिश्रम करतो पण तरीही त्याला त्याच्या उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही. आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT