Sindhudurg News : जिल्ह्यात गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील पाडलोस केणीवाडा येथील आंबा, काजू, नारळाच्या झाडांचे गव्यांनी मोठे नुकसान केले. उत्पादनक्षम झाडांचे गवे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्याच्या सर्वच भागांत गव्यांचा उपद्रव वाढला आहे. गव्यांचे कळपच्या कळप बागांमध्ये फिरत आहेत. आंबा, काजुच्या झाडांचे सर्वत्र नुकसान करीत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय इतर पिकांचेदेखील गवे नुकसान करताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील पाडलोस केणीवाडा येथील शेतकरी प्रेमानंद साळगावकर यांच्या बागेतील हापूस, केसरची दहा ते बारा झाडे गव्यांनी पूर्णतः मोडली. तर काजुच्या १५ ते २० झाडांचेदेखील नुकसान केले.
दीड-दोन वर्षांच्या नारळाचेदेखील गव्यांनी नुकसान केले. गव्यांच्या कळपात आठ ते अकरापर्यंत गवे आहेत. सायकांळी किंवा पहाटे लवकर हे गवे शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गव्यांकडून आंबा, काजू, नारळ बागेचे सतत नुकसान केले जात आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून अन्य शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल. =- प्रेमानंद साळगावकर, शेतकरी, पाडलोस
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.