Farmer Loan Waive
Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Rayatu bandhu : तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी मदत

Team Agrowon

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणा (Telangana) राज्य शेतकऱ्यांसाठी 'रयतु बंधू' (Rayatu Bandhu) योजना राबवते. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना (Farmer) एकरी ५ हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. वर्षातून दोन वेळा ५-५ हजार रुपयांची मदत केली जाते. या योजनेच्या १० व्या हप्त्यासाठी तेलंगणा सरकारने ७६५६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रयतु बंधूचा लाभ ७० लाख शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही तेलंगणा सरकारने सांगितले आहे.

शेती आणि शेतकऱ्याला मदत म्हणून तेलंगणा सरकारने योजना राबवली आहे. २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली. शेती क्षेत्रात मूलभूत अशी गुंतवणूक करण्याचे तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट आहे.

रयतु बंधू अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रुपये मदत देते. ज्यामधून शेतकरी बियाणे खरेदी करू शकतात. तसेच खते-औषध आणि मजुरी खर्चासाठी ही मदत देण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी २८ डिसेंबरपासून राज्यात रयतू बंधू योजना लागू करण्याचे आदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी दिली होते.

तेलंगणा सरकारच्या कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, "रयतु बंधू योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात संक्रांतीच्या सणापर्यंत जमा करण्यात येणार आहे.

तेलंगणा सरकारने जूनमध्ये दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ५०४४८ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली होती. सरकारच्या मते, ग्रामीण भागाचा विकास करणे आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT