River Linking Agrowon
ॲग्रो विशेष

River Linking Project : ‘नदी जोड’मुळे खारपाणपट्ट्याला फायदा

वैनगंगा प्रकल्पातून सोडलेले पाणी‎ पारंपरिक कालव्याऐवजी बंद‎ पाईपमधून ४२६ किलोमीटरचा प्रवास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करून बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा‎ नदीत आणले जाणार आहे.‎

Team Agrowon

Akola News : राज्य शासनाने यंदाच्या अर्थ संकल्पात जाहीर केलेल्या नदीजोड प्रकल्पाचा फायदा अकोला‎, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील खारपाणपट्ट्याला होणार आहे.

वैनंगगा-न‌ळगंगा‎ नदीजोड प्रकल्पाचे (Wainanga-Nalganga Interlinking Project) काम सुरू होणार‎ असल्याने अकोला जिल्ह्याला २८२.३४‎ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त‎ जलसाठा उपलब्ध होणार असून, ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन‎ सिंचनाखाली येण्यास मदत होईल. ‎

या प्रकल्पामुळे एकीकडे पिण्याचे‎ पाणी तर दुसरीकडे सिंचनासाठी‎ पाणी उपलब्ध होऊ शकेल.‎ खारपाणपट्ट्यातील पाणी समस्या‎ निकाली निघण्यास मदत होणार‎ आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यास‎ किती काळ लागेल याची शाश्वती नाही.

मात्र,‎ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना‎ मोठा दिलासा मिळू शकेल. पूर्व विदर्भात असलेल्या‎ वैनगंगेच्या खोऱ्यात ११७ टीएमसी पाणी आहे.

वैनगंगा‎ प्रकल्पामुळे ५७ टीएमसी पाणी अडवले गेले आहे.‎ उर्वरित ६० टीएमसी पाणी वाहून‎ जाते. हे सर्व लक्षात घेऊनच राष्ट्रीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जलविज्ञान प्राधिकरण (हैदराबाद)‎ यांनी २००९ ला सर्वेक्षण केले होते.‎ त्या वेळी या नदीजोड प्रकल्पासाठी ८‎ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित‎ होता.

त्यावेळी सर्वेक्षणाच्या‎ पलिकडे या प्रकल्पाचे काम गेले‎ नाही. मात्र, नागपूर जलविकास‎ प्राधिकरणाने नव्याने सर्वेक्षण करुन‎ प्रकल्प अहवाल सादर केला.‎

वैनगंगा प्रकल्पातून सोडलेले पाणी‎ पारंपरिक कालव्याऐवजी बंद‎ पाईपमधून ४२६ किलोमीटरचा प्रवास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करून बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा‎ नदीत आणले जाणार आहे.‎

नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला‎ या चार जिल्ह्यांना मुबलक पाणी‎ उपलब्ध होऊ शकेल. तर सर्वाधिक‎ कमी पाणी यवतमाळ जिल्ह्याला‎ मिळणार आहे. प्रत्येक‎ जिल्ह्यासाठी नदी जोड प्रकल्प‎ उपयुक्त ठरणार असला तरी‎ अकोला जिल्ह्यासाठी हा‎ प्रकल्प वरदान ठरणार आहे.

८४ हजार हेक्टर जमीन‎ सिंचनाखाली येणार

या‎ प्रकल्पाअंतर्गत‎ ७५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीही‎ प्रस्तावित आहे. अकोला‎ जिल्ह्यात निम्न काटेपूर्णा,‎ येळवण, सिसा उदेगाव, चिखलगाव‎ या ठिकाणी जल प्रकल्प बांधण्यात‎ येणार असून काटेपूर्णा प्रकल्पात‎ पुनर्भरण केले जाणार आहे.

यामुळे‎ जिल्ह्यात २८२.३४ दशलक्ष घनमीटर‎ अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार‎ असून, ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन‎ सिंचनाखाली येणार आहे.‎

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT