Banana Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांची विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

Team Agrowon

Jalgaon News : फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ च्या हंगामात सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारकांना अद्याप परतावे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी व लोकप्रतिनिधी बुधवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. या वेळी तडकाफडकी बैठक घेण्यात आली. त्यात शेतकऱ्यांचे परतावे तत्काळ दिले जावेत, अशा सूचना करण्यात आल्या.

खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शेतकरी सुरेश धनके, श्रीकांत महाजन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव कुमार, शिवाजी पाटील, हरलाल कोळी, प्रशांत महाजन, राहुल महाजन, शुभम पाटील, महेश महाजन, भागवत महाजन आदी बैठकीत उपस्थित होते.

जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत ७७ हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले. परंतु दिवाळी काळात यातील अल्पच शेतकऱ्यांना परतावे मिळाले. अनेक केळी विमाधारकांना ते मिळालेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे विमाप्रस्ताव पोर्टलवर प्रलंबित आहेत. काहींचे प्रस्ताव मंजूर आहेत. प्रस्ताव प्रलंबित का आहेत, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

अनेक शेतकऱ्यांचे पैसे निर्देशित बँक खात्याऐवजी पोस्टाच्या खात्यात आले. तेथून पैसे काढताना अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांचे पैसे विमा कंपनीने दिल्याचे पोर्टलवर दिसते, परंतु प्रत्यक्षात बँक खात्यात पैसेच आलेले नाहीत. याबाबत बँक काहीही स्पष्टीकरण देत नाही. कृषी विभागाकडे माहिती मिळत नाही.

विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील काहीही माहिती देण्यास नकार देतात. तांत्रिक अडचण सांगितली जाते. नेमकी अडचण कुठे आहे, अशी विचारणा खडसे यांनी केली. बँक व विमा कंपनीने समन्वयातून कार्यवाही करावी. कृषी विभाग, विमा कंपनीने शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी. त्यांना वणवण फिरविले जात आहे. हा प्रकार योग्य नाही, असे मुद्दे शेतकऱ्यांनी उपस्थित केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT