Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : थंडीमुळे केळी निर्यातीवर परिणाम

Banana Market : देशातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट आहे. थंडीमुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. याचा शेतकरी आणि निर्यातदारांना सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.

Team Agrowon

Pune News : देशातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट आहे. थंडीमुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. याचा शेतकरी आणि निर्यातदारांना सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तर या परिस्थितीचा फायदा इक्वेडोर आणि फिलिपिन्सला होण्याची शक्यता आहे.

भारत हा केळीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. या राज्यांमध्ये केळी उत्पादक पट्ट्यात तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. तसेच तापमानात चढ-उतारही सुरू आहेत. ज्यामुळे काढणीसाठी तयार असलेल्या केळीचे रंग विकृत झाले आहेत. तसेच केळीला जास्त थंडीने आतून इजाही झाली आहे.

कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने इशारा दिला आहे, की थंड हवेमुळे होणाऱ्या जखमांमुळे निर्यातीचे प्रमाण १५ ते ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते. ज्यामुळे मोठा आर्थिक तोटा होईल. इक्वेडोर आणि फिलिपिन्ससारखे स्पर्धात्मक देश या संकटाचा फायदा घेऊ शकतात.

पिनॅकल अॅग्रोटेकचे व्यवसाय प्रमुख कौस्तुभ भामरे यांनी सांगितले, की काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत २४ ते २८ रुपये प्रति किलो किमतीत करार केला होता. पण सध्या हवामानामुळे केळीच्या सालीवर लाल ठिपके पडत आहेत. त्यामुळे किमती ८ ते १४ रुपयांपर्यंत खाली गेल्या आहे. ज्यांनी रशिया आणि इराणकडून पहिल्यांदाच ऑर्डर मिळवली होती. थंडीच्या लाटेमुळे निर्यातदारांना निर्यात सौदे पूर्ण करता आले नाहीत. तरीदेखील पश्‍चिम आशिया आणि आखाती देशांमधून मागणी मजबूत आहे.

निर्यातीसाठी मागणी

रशिया आणि इराणमधील युद्धाचा केळी निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नाही. कारण टेबल फ्रूटची मागणी कायम आहे आणि भारत हा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. महाराष्ट्रातील जालना आणि सोलापूर येथे मोठ्या प्रमाणावर उगवलेली रोबस्टा केळीला जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. थंडीचा फटका बसू नये यासाठी शेतकरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत केळीची लागवड करत आहेत. जेणेकरून जुलै-ऑगस्टमध्ये काढणी करता येईल. मात्र शेतकऱ्यांना लागवडीसाठी उती संवर्धित रोपांचीही टंचाई भासत आहे, असेही भामरे यांनी सांगितले.

केळीची गुणवत्ता सध्याच्या वातावरणामुळे कमी झाली आहे. जो माल निर्यात होऊ शकत नाही त्याची वाहतूकही जिकिरीची होत आहे. त्यामुळे देशात केळी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी थंडीच्या आधी काढणी होईल असे लागवडीचे नियोजन करून यावर उपाय करू शकतात.
अजय केडिया, संचालक केडिया कमोडिटीज
थंडीमुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. निर्यातक्षम मालाचे भाव यामुळे कमी होत आहेत. निर्यातक्षम मालाची गुणवत्ताच कमी झाल्याने निर्यात कमी झाली. याचा फायदा इक्वेडोर आणि फिलिपिन्सला होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
कौस्तुभ भामरे, व्यवसाय प्रमुख, पिनॅकल अॅग्रोटेक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT