Bamboo Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Cultivation : धाराशिव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर होणार बांबू लागवड

Team Agrowon

Dharashiv News : शेतकऱ्यांच्या सहभागाने धाराशिव जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यातून हेक्टरी सात लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. बांबूपासून अठराशे उत्पादने तयार होतात.

त्यातूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकते. दुसऱ्या बाजूला दगडी कोळशाला पर्यायी इंधन म्हणून तसेच अन्य पेट्रोलियम इंधनाला पर्याय म्हणून बांबूचे बायोमास हे इंधन वापरात येऊ शकते.

राज्यात दहा लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. ते क्षेत्र आपण पाहिले आहे. तिथल्या सत्तर गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांशी भेटलो आहे. तेथील शेतकऱ्यांचीच तिथे बांबू लागवड करण्याची इच्छा आहे. त्यासाठी जवळपास सातशे कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

बांबूपासून प्राणवायू ऑक्सिजन मोठ्याप्रमाणात मिळतो. जग सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाच्या तोंडावर उभे आहे. त्यातून वाचण्यासाठी बांबू लागवड उपयोगी आहे. कारण वातावरणातील कार्बन शोषण आणि ऑक्सिजनचे उत्सर्जन करण्याचे प्रमाण बांबूत लक्षणीय आहे.

परिक्षणांती शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. यामुळे भविष्यातील नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी बांबू लागवड उपयोगी आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालू केले आहेत. बांबूचे औद्योगिक धोरण शासन लवकरच जाहीर करणार आहे.

असे आहे योजनेचे स्वरूप

हेक्टरी सात लाखांचे अनुदान

सात दिवसांत मंजुरी

बायोमास पलेट्स बनविणाऱ्या उद्योजकांना बँकांचे राहील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT